एक्स्प्लोर

Ajit Pawar on RSS : आरएसएसने म्हटलं राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, आता अजितदादा म्हणाले...

Ajit Pawar on RSS : "महाराष्ट्रात भाजपकडून अनावश्यक राजकारण केले गेले. शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत होते, तरीदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतले गेले. हे महाराष्ट्रातील मतदारांना आवडले नाही", अशी टीका आरएसएसच्या मुखपत्रातून करण्यात आली होती.

Ajit Pawar on RSS : " महाराष्ट्रात भाजपकडून अनावश्यक राजकारण केले गेले. शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत होते, तरीदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतले गेले. हे महाराष्ट्रातील मतदारांना आवडले नाही. हा प्रयोग केला नसता तर शरद पवार सक्रीय राजकारणापासून दूर सारले गेले असते. मात्र, अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे मेहनतीने राज्यात नंबर एकचा पक्ष बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली" अशी टीका लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरएसएसच्या मुखपत्रातून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे

पुण्यात पक्षाची बैठक झाल्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संघाच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मला त्याबाबत काहीही बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांचे लोक आपली मतं मांडत असतात. निवडणूक काय घडलं, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत असतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर मला कोणतीही टीका-टिपण्णी करायची नाही. मी विकासावर लक्ष केंद्रीत करणार आहे. आपल्या जिल्ह्याला, राज्याला कशी मदत होईल, महत्वाची कामे कशी मार्गी लागतील, याकडे मी लक्ष केंद्रीत केलं आहे, असं अजित पवार म्हणाले. 

आरएसएसने काय म्हटलं होतं?

(ऑर्गनायजर, लेखक- रतन शारदा, यांनी लिहिलेल्या लेखातील मुद्दे) 

2024 लोकसभेचा निकाल हा अतिआत्मविश्वास असलेल्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी रियालिटी चेक आहे. सोशल मीडियावर पोस्टर्स आणि सेल्फी शेअर केल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी थेट मैदानावर उतरुन मेहनत घ्यावी लागते. मोदींच्या नावावर निवडून येवू या भ्रमात सगळे होते, रस्त्यावर जनतेच्या मनात काय आहे याचा कानोसा घेतलाच नाही. संघाने भाजपचं काम केलं नाही या आरोपात तथ्य नाही. 1973 ते 1977 हा आणीबाणीचा काळ सोडला तर संघाने कधीच प्रत्यक्ष राजकारणात थेट भाग घेतला नाही. 2014 ला संघाने शतप्रतिशत मतदानासाठी प्रयत्न केले होते. मात्र यावेळी संघाने राष्ट्र बांधणी, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय विचारांना पाठिंबा मिळावा, लोकांनी मतदानाला बाहेर पडावं यासाठी प्रयत्न केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nilesh Lanke : गजा मारणेची भेट हा केवळ अपघात, त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Embed widget