एक्स्प्लोर

Nashik Sanjay Raut : सरकारला प्रश्न विचाराल तर तुरुंगात जाल, याचं मी उदाहरण, संजय राऊतांचे टीकास्त्र 

Nashik Sanjay Raut : तुम्ही आमचे गळे दाबून आम्हाला तुरुंगात डांबून कोणत्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहात? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

Nashik Sanjay Raut : देशांमध्ये अशा प्रकारचे वर्तन वृत्तपत्रांच्या (News Papers) बाबतीत फार कधी घडल्याचं स्मरणात नाही. सरकारला प्रश्न विचारले जातात, तिथे अशा प्रकारच्या धाडी टाकल्या जातात. अनेकदा अटक केली जाते, याचं मी उदाहरण असल्याचे सांगत लोकशाही संकटात आहे, असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. 

आज सायंकाळी नाशिकमध्ये (Nashik) आगमन झाल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बीबीसीच्या कार्यालयावर (BBC) छापेमारीबाबत संजय राऊत म्हणाले, सरकारला प्रश्न विचारले जातात, तिथे अशा प्रकारच्या धाडी टाकल्या जातात. अटक केली जाते, याचं मी उदाहरण आहे. लोकशाही संकटात आहे. या देशामध्ये अशा प्रकारचे वर्तन वृत्तपत्रांच्या बाबतीत फार कधी घडल्याचं स्मरणात नाही आणि आणीबाणीमध्ये वृत्तपत्रांमध्ये सेन्सॉरशिप लावली. याच भारतीय पक्षानं मोठे आंदोलन उभारलं होतं. त्यांचं सरकार आल्यानंतर न्यायपालिका आणि वृत्तपत्र यांचं गळा घोटण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न विचारला, तेव्हा राहुल गांधींना नोटीस देण्यात आली, असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले कि, बीबीसीने काही विषयावर डॉक्युमेंटरी (BBC Documentary) केली. त्यांच्या कार्यालयावर आज छापेमारी करण्यात आली आहे. देशांमध्ये लोकशाही आहे, तुम्ही उत्तर द्या, तुमचं ही ऐकले जाईल. तुम्ही अनेक माध्यमांचे मालक आहात. अदानीने सर्व माध्यम आपल्याकडे विकत घेतली आहेत. तुम्ही आमचे गळे दाबून आम्हाला तुरुंगात डांबून कोणत्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहात? असा सवाल त्यांनी केला. पंडित नेहरू पासून राजीव गांधी, मनमोहन सिंगांपर्यंत कोणत्याही राजवटीमध्ये या देशात अशा प्रकारचं वृत्तपत्रांच्या बाबतीत वाईट कृत घडल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे आपल्या लोकशाही संदर्भात जगामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

उद्योगानंतर आता तीर्थक्षेत्रही पळवू लागले 

भीमाशंकर हे आसाममध्ये असल्याचं एका नेत्याने म्हटलं आहे. त्यावरून संजय राऊत म्हणाले की आसामच्या संदर्भात आपल्या मुख्यमंत्र्यांचा अतिव प्रेम आहे. कामाख्या देवी वगैरे, आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आमचे मुख्यमंत्री काय बोलतात, हे पहावे लागणार आहे. हा एक पोरकटपणा वाढत चालला असून गुजरात आपल्या उद्योगांवर आक्रमण करत आहे. आता आसामचे मुख्यमंत्री आपल्या देवधर्मांवर आक्रमण करू लागले आहे. हे काही चांगलं नसल्याचे राऊत म्हणाले.

मतदारांचा कौल स्पष्ट आहे.. 

पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी थेट अमित शहा (Amit Shaha) येत आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, यावरून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे. विधान परिषद निवडणुकांमध्ये एखादी जागा वगळता सर्व जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. हजारो शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी त्यांचा कौल आणि कल हा स्पष्ट दिला आहे. हे सर्वे जे येतात ते दोन ते तीन हजार लोकांचे नमुने घेऊन केले जातात. या निवडणुकांमध्ये 50 ते 60 हजार त्याचबरोबर एक लाखांपर्यंत मतदान प्रक्रिया होत असते. यामुळे लक्षात येते की या लोकांनी भाजप पक्षाला नाकारले आहे आणि तोच निकाल कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही. 
 

न्यायपालिकेवर आमचा विश्वास... 

उद्धव ठाकरे यांनी आज बोहरी समाजाची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दिवशी आले होते. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण होते. मात्र त्या दिवशी ते जाऊ शकले नाही. मात्र आज ते आवर्जून बोहरी समाजाला भेटण्यासाठी गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि बोहरी समाज यांचे घनिष्ठ संबंध होते. आम्ही देखील अनेक सोहळे कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवलेली आहे. तर सुप्रीम सुनावणीवर संजय राऊत म्हणाले की, उद्या काय होते ते बघूया. मात्र आज ज्या पद्धतीने मंत्री उदय सामंत म्हणाले कि, काही झालं तरी निकाल आमच्या बाजूने लागेल. त्याचबरोबर नारायण राणे यांनी देखील ब्रेकिंग न्यूज दिली की चिन्ह हे शिंदे यांना मिळणार, तसेच काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आपल्या बाजूला लागेल याचा अर्थ असा आहे की न्यायपालिका यांच्या खिशात असल्यासारखे वागत आहेत. मात्र आम्ही इतकेच सांगू की न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget