एक्स्प्लोर

Rohit Pawar : बालेकिल्ला कोणाचा हे लोक दाखवून देतील, पवारसाहेबांनी सांगितलेल्या नावावर लोक विश्वास ठेवतील : रोहित पवार 

बालेकिल्ला कोणाचा हे येत्या काळात लोक दाखवून देतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाशिकमधील (Nashik) येवला इथं केलं.  

Rohit Pawar : बालेकिल्ला कोणाचा हे येत्या काळात लोक दाखवून देतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाशिकमधील (Nashik) येवला इथं केलं.  पवारसाहेब ज्यांचे नाव घोषित करतील, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये लोक निर्णय घेतात कोणाला निवडून द्यायचे ते, व्यक्ती बघून, विचार बघून लोक मतदान करतात असेही रोहित पवार म्हणाले. येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांची सभा झाल्यानंतर रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार यांची येवल्यात (Yeola) जाहीर सभा पार पडली. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शरद पवरा यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार उपस्थित होते. पवार साहेब येणार समजलं तर हजारोच्या संख्येने येथे कार्यकर्ते हजर झाले. येवल्यात अतिशय ताकदीने आणि मोठी सभा झाल्याचे शरद पवार म्हणाले. इथे पैसे देवून आणलेले लोक नव्हते असंही ते म्हणाले. पवार साहेबांनी योग्य माणसांना पद दिले होते. मात्र, जेव्हा हे लोक विचार सोडतात तेव्हा मात्र तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मतदारांचा विश्वासघात करता. मतदारांचा विश्वासघात झाल्यामुळं पवार साहेबांनी मतदारांची माफी मागितली असावी असे रोहित पवार म्हणाले. भविष्यात येवला मतदारसंघात पवार साहेब जे नाव घोषित करतील, त्या नावावर लोक पुन्हा विश्वास ठेवतील, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. 

पक्षात फूट पडल्यानंतर येवल्यात पवारांची पहिलीच सभा

राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी नऊ आमदारांना सोबत घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राजकीय घमासान सुरु आहे. दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्यांनी येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली. काल त्यांची येवल्यात पहिली जाहीर सभा झाली. या सभेला जाताना पवार पावसात भिजल्याचे पाहायला मिळालं. मागच्या वेळी पवार जेव्हा पावसात भिजले, तेव्हा त्याचा परिणाम राज्यातील राजकारणात दिसला होता. 

नेमकं काय म्हणाले शरद पवार 

महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याने गेली अनेक वर्ष पुरोगामी विचाराला साथ दिली आहे. कोणत्याही जिल्ह्यांनी साथ सोडली नाही, आज मी इथे आलोय तर ते कोणावर टीका करण्यासाठी नाही, आज मी माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही साथ दिली. पण माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की तुम्हा सगळ्यांची माफी मागायची, म्हणून आज इथे आल्याचे शरद पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sharad Pawar : येवल्यात मी कोणावर टीका करायला नाही तर माफी मागायला आलोय : शरद पवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget