एक्स्प्लोर

Nashik Rain : अर्धा तास गारपीट झाली अन् टरबूज शेती उध्वस्त झाली, नाशिकच्या शेतकऱ्याने मांडली व्यथा 

Nashik Rain : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप (staff Strike) मिटला आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सुरवात झाली.

Nashik Unseasonal Rain : जुनी पेन्शन (Old Pension) योजनेच्या मुद्यावरून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप (staff Strike) मिटला आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सुरुवात झाली. पंचनामे सुरू झाले असले तरी हजारो शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील (Chandwad) शेतकऱ्याची अवकाळी पावसामुळे टरबूज शेती उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

आपल्या मागण्यांसाठी संप पुकारून आठ दिवस सरकार, सर्वसामान्य जनततेला सरकारी कर्मचाऱ्यांनी वेठीस धरले होते. यात आधीच अवकाळीचा मार सहन केलेला बळीराजादेखील भरडला गेला. लहरी निसर्गाशी दोन हात करून कांदा द्राक्ष, गहू, हरभरा, फळं, भाजीपाला पिकवला. मात्र, शेतीमाल ऐन बाजारपेठेत येण्याच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट आल्यानं शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले. होत्याचे नव्हते झाले. मायबाप सरकारकडे शेतकरी डोळे लावून बसला. मात्र शेतकऱ्यांच्या वर्तमानापेक्षा कर्मचारी ना त्यांच्या भविष्याची चिंता अधिक महत्वाची वाटली. त्यांनी संपाचे हत्यार उपसले आणि पंचनामे रखडले. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यात 600 गावातील हजारो शेतकऱ्यांचे आठ एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. चांदवड तालुक्यातील पन्हाळे गावात चार दिवसांपूर्वी अर्धातास गारपीट झाली. यात सोमनाथ आवारे यांची टरबूज शेती उध्वस्त झाली. टरबूजाना गारांचा मार लागल्यानं वेल खराब झालीच, मात्र आत टरबूज गुर ढोरे ही खाण्याच्या अवस्थेत नसल्याने फेकून देण्याची वेळ आली असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. जी परिस्थिती टरबूजाची त्याहूनही भयंकर अवस्था कांदा पिकाची आहे. पुढच्या वर्षी कांद्याचे चांगले उत्पन्न घेता यावे, यासाठी घरचे बियाणे तयार केले. मात्र बियाणे तयार होण्याच्या स्थितीत आलेल्या डोंगळ्या ना गारपिटीचा मार लागला आणि त्यांनी मानच टाकून दिली. त्यामुळे हा हंगाम तर गेलाच पण पुढंचाही हंगाम गेला आहे. 

अशीच परिस्थिती सर्वत्र बघायला मिळत आहे, सूर्यभान वाघ एकत्र कुटुंब पद्धतीत वाढले. ते शेतीही एकत्र कसतात, त्यामुळे 20 ते 25 एकर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड केली लाखो रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पुढील एक महिन्यात कांदा बाजारठेत  येणार होता, काही कांद्याची चाळीत साठवण ही करता आली असती. मात्र आता हाच कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. खरिपात ही अतिवृष्टीमुळे नुकसान झले होते, पीक विमा काढला मात्र अद्यापही।मदत मिळाली नसल्याने भविष्यात तरी काय मिळणार असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे. संपातही काही कर्मचारी पंचनामे करण्याचे काम करत होते. मात्र,  आता दोन दिवसात संपूर्ण पंचनामे पूर्ण करून नवीन निकष प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असा विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत. 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार नाशिक दौऱ्यावर

कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून ते आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान चांदवड, निफाड तालुक्यातील काही गावांना भेट देणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.
Nagar Parishad Nagar Panchayat Election : 22 Dec 2025 : धुरळा निवडणुकीचा Superfast News : ABP Majha
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Maharashtra Local Body Election: राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Sunil Shelke : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
WTC Latest Points Table: भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
Embed widget