एक्स्प्लोर

नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट, महायुतीच्या तिढ्यात महंत अनिकेत शास्त्रींची उडी, भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक

Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात संघर्ष सुरू असताना आता महंत अनिकेत शास्त्री यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. ते भाजपकडून इच्छुक आहेत.

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे महायुतीचे (Mahayuti Seat Sharing) त्रांगडे दोन दिवसांत सुटेल, अशी चर्चा असताना यात पुन्हा नवा ट्विस्ट आलाय. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन पक्षात संघर्ष सुरू असताना धर्म अभ्यासक, महर्षि पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

महंत अनिकेत शास्त्री हे दोन दिवसांत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महंत अनिकेत शास्त्री भाजपकडून (BJP) निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावरून आपल्या उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली असल्याचा दावा अनिकेत शास्त्री यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय.

मोदी गॅरंटी असल्याने निवडणुकीच्या रिंगणात - अनिकेत शास्त्री 

एकीकडे हेमंत गोडसे देवाला साकडं घालत आहेत तर दुसरीकडे अनिकेत शास्त्री निवडणुकीची तयारी करत आहेत. नाशिक धार्मिकनगरी आहे. दर 12 वर्षांनी नाशिकला कुंभमेळा (Kumbh Mela) भरत असल्याने धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती संसदेत जावे या भावनेतून आणि मोदी गॅरंटी असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

अनिकेत शास्त्री यांच्या नावाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे (Hemant Godse), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अजय बोरस्ते (Ajay Boraste), माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या नावाची चर्चा असतानाच थेट भाजपकडून अनिकेत शास्त्री यांचे नाव समोर आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याकडे आता राज्याचं लक्ष लागले आहे. 

शांतीगिरी महाराजांनी पहिल्याच दिवशी भरला नाशिकमधून उमेदवारी अर्ज

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे. काल (दि. 26) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शांतीगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर हेमंत गोडसे यांनी त्यांचा आणि त्यांच्या सुनबाई भक्ती गोडसे यांची उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे यांनीदेखील अर्ज घेतला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

नाशिक भाजपमध्ये नाराजीनाट्य, भारती पवारांवर आरोप करत युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, त्याचवेळी पक्षाकडून हकालपट्टी

नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच उमेदवारीचा लाभ !

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Railway Station : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटनाABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 16 February 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सNew Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यूABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 16 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.