एक्स्प्लोर

सर्व सत्ता, साधन, मोदींकडे मग एकटे कसे? जे काँग्रेसनं निर्माण केलं ते मोदींनी मित्रांना विकले; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Priyanka Gandhi : नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात काय केले? जे काँग्रेसने निर्माण केले ते मोदींनी मित्रांना विकले, असा हल्लाबोल प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.

Priyanka Gandhi नंदुरबार : सर्व सत्ता, साधन, मोदींकडे  आहे. मग आपण एकटे कसे लढत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या दहा वर्षात काय केले? जे काँग्रेसने निर्माण केले ते मोदींनी मित्रांना विकले, असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील (Nandurbar Lok Sabha Constituency) काँगेसचे (Congress) उमेदवार गोवाल पाडवी (Gowaal Padavi) यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, आदिवासींसाठी काँग्रेसने अनेक योजना सुरु केल्या.  राहुल गांधी असे नेते आहेत ज्यांनी 4 हजार किलोमीटरची यात्रा केली आहे. काँग्रेसचा पाया गांधी विचारांचा आहे. लोकशाहीत जनता सर्वोतोपरी असते. पण भाजपची विपरीत विचारधारा आहे. आदिवासी संस्कृतीचा आदर भाजप करीत नाहीत, ते संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या वेळी आदिवासींवर अन्याय होतो त्यावेळी भाजप गप्प राहते. आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने एकमेव आदिवासी मुख्यमंत्री सोरेन जेलमध्ये पाठवले आहेत. 

भाजपकडून आदिवासींचा सतत अपमान 

मोदी देशातील गरिबांबद्दल बोलतात एक आणि दुसरे करतात. जे केले जाते त्याचा राजकीय फायदा घेतला जात नाही. भाजप सतत आदिवासींचा अपमान करत आहे. देशात 22 लाख आदिवासींना जमीन पट्टे दिले नाहीत. मोदी सांगता सबरीचा पुजारी आहे. पण देशात शेकडो शबरींचा अपमान केला जातं आहे, तेव्हा मोदी का? गप्प राहतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

इंदिरा गांधींकडून काहीतरी शिका  

कुठे शबरी आणि कुठे मोदीमच्या पोकळ गप्पा? कुस्तीपटू न्याय मागत असताना, मोदी गप्प होते, त्यामुळे कुठे राम आणि कुठे मोदी? अत्याचारींना तिकीट दिले गेले. सर्व सत्ता, साधन, मोदींकडे  आहे. मग आपण एकटे कसे लढत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात काय केले? हे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यांना हिंमत हवी असेल तर त्यांनी इंदिरा गांधींकडून शिकावं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे देखील दोन तुकडे केले, अशी हिंमत दाखवा. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर केला. 

आम्ही मोदींप्रमाणे सत्ता बदल करणार नाही

गरिबांकडे अनेक समस्या आहेत. त्यांच्याकडे मोदी स्वतःच्या समस्या मांडतात. मोदी यांचा संपर्क जनतेशी तुटला आहे. त्यांचे नेतेच त्यांना घाबरतात. देशातील गरीब खचला आहे, त्याला उत्पन्न मिळत नाही. शेती करणे कठीण झाले आहे. पण मोदींना हे कळत नाहीत. त्यांना कोण सांगण्याची हिंमत करीत नाही. गेल्या दहा वर्षात मोदींचा एका आदिवासीसोबत फोटो नाही. एकदाही आदिवासी सोबत आले नाहीत. मोदींनी देशात सत्तेसाठी राजकारण केले जाणारी व्यवस्था निर्माण केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडले. पैसे देऊन लोकशाही विरोधात सत्तांतर केले. आम्ही मोदींप्रमाणे सत्ता बदल करणार नाही. मोदींनी देशाची संपत्ती सर्व श्रीमंत मित्रांना देऊन टाकली.

काँग्रेसची गॅरंटी, सर्व आश्वासन पूर्ण करणार 

जे काँग्रेसने निर्माण केले ते मोदींनी मित्रांना विकले. मोदी राज्यात मोठ्या उद्योपतींचे 16 लाख करोडचे कर्ज माफ केले. जोवर आवाज बंद होत नाही तोवर बोलणार आहे. सरकार बदलेपर्यंत बोलत राहणार आहे. काँग्रेसची गॅरंटी, सर्व आश्वासन पूर्ण करणार आहे. 25 लाखापर्यंत उपचार मोफत होणार आहेत. परिवारातील सर्वात मोठ्या महिलेच्या खात्यात एक लाख देणार आहोत.  जो पदवीधर आहे त्याला आम्ही नोकरी देणार आहोत. 30 लाख पद भरणार आहोत, अशा घोषणा त्यांनी यावेळी केल्या. 

आणखी वाचा 

अमेठी सोडून राहुल गांधींना रायबरेली मतदारसंघ का निवडला? काय आहे रायबरेलीचा इतिहास? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget