एक्स्प्लोर

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : सोशल मीडिया उत्तमच, पण जरा जपून; 'समाज माध्यमातील अभिव्यक्ती - एक उलट तपासणी'मध्ये तज्ज्ञांचे मत

कितीही दडपशाही असली तरी सोशल मिडियावर लोकशाही जिवंत असते. मात्र, हे वापरताना आपण सजग आहोत का, असा प्रश्न स्वतःलाच विचारण्याचे आवाहन प्रशांत देशमुख यांनी केले.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : सोशल मीडिया हे अतिशय लोकतांत्रिक माध्यम असले तरी ते अतिशय अनियंत्रित आहे. त्यामुळे, सोशल मीडिया उत्तम असले तरी त्याचा वापर जपून केला जावा, अशी भावना ज्येष्ठ सोशल ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी 'समाज अभिव्यक्ती अभिव्यक्ती : एक उलट तपासणी' या सत्रात व्यक्त केली. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी मनोहर म्हैसाळकर दालनात पार पडलेल्या या सत्रात अध्यक्षस्थानाहून बोलत होते. या सत्रात पत्रकार रमेश कुलकर्णी, प्रशांत देशमुख, संदीप भारंबे, नितीन नायगावकर सहभागी झाले होते. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते. सोशल मिडियावर आपणच लिहितो, वाचतो, लाईक करतो, शेअर करतो आणि कमेंटेही आपणच करतो. त्यामुळे आपणच आपली उलट तपासणी करण्याचे अधिकारही आपलेच असल्याचे शैलेश पांडे म्हणाले.

दडपशाही असली तरी सोशल मिडियावर लोकशाही जिवंत

अभिव्यक्ती हा विषय प्रत्येक सजिवाच्या जन्मापासून चिकटते. त्यामुळे सगळ्याच माध्यमांसाठी अभिव्यक्ती सारखीच आहे. सोशल मिडिया सहज उपलब्ध होणारे माध्यम आल्याने त्याचा आपण सगळ्यांनी सहजपणे स्वीकार केला आहे. त्यामुळे, एखादा विचार एखाद्याला आवडतो तर एखाद्याला आवडत नाही आणि त्याचा सन्मान करावा आणि आपली विवेकबुद्धी जागृत ठेवावी असे संदीप भारंबे यावेळी म्हणाले. समाज माध्यम हे मानवी स्वभावावर स्टॅण्ड झालेले माध्यम आहे. आता शिक्षणाऐवजी सोशल मीडिया हेच समाजपरिवर्तनाचे माध्यम म्हटले जाते. कितीही दडपशाही असली तरी सोशल मीडियावर लोकशाही जिवंत असते. मात्र, हे वापरताना आपण सजग आहोत का, असा प्रश्न स्वतःलाच विचारण्याचे आवाहन प्रशांत देशमुख यांनी केले.

वाढलेल्या स्कीन टाईममुळे टेंशन

सोशल मीडियावरील स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणताना माणसातील माणुसकी हरवली आहे. आरोग्याचे दुष्परिणाम दिसायला लागले आहे. तेव्हा, सोशल मिडीयाची उलट तपासणी करताना त्याची सुरुवात आपणापासूनच होते, अशी भावना रमेश कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. सोशल मीडियाची उलट तपासणी करण्याची कुठलीच यंत्रणा सध्या तरी अपलब्ध नाही. मात्र, समाज माध्यमाने जो बोलत नव्हता त्याला शब्द दिले आणि जो बोलत होता त्याला शांत केले. असा परस्पर विरोधाभास सोशल मीडियाने निर्माण केल्याचे मत नितीन नायगावकर यांनी व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार डॉ. कल्पना मकरंदे यांनी मानले.

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget