एक्स्प्लोर

Separate Vidarbha : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा एल्गार;  31 डिसेंबर पर्यंत सरकारला अल्टीमेटम, त्यांनंतर गनिमीकाव्याचा इशारा

Separate Vidarbha : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसह विदर्भातील अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाई संदर्भात विदर्भवादी गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत.

नागपूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता गेल्या कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या  (Separate Vidarbha) मागणीने आता अधिक जोर धरला आहे. उपराजधानी नागपूरसह (Nagpur) विदर्भातील अनेक भागत विदर्भवाद्यांचा एल्गार पुकारत आंदोलन केले जात असल्याचे चित्र आहे. त्याचं पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसह विदर्भातील अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाई संदर्भात नागपूरात (Nagpur) माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भवादी गेले चार दिवस उपोषण करत आहेत. या उपोषण दरम्यान चार उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृद्ध विदर्भवादी कार्यकर्ते गेले चार दिवस आंदोलन करत असतांना देखील सरकारने अजूनही आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, असा विदर्भवाद्यांचा आरोप आहे. 31 डिसेंबर पर्यंत उपोषणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन करू.  मात्र, त्यानंतर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून गनिमीकावा केला जाईल, असा इशारा विदर्भवाद्यांनी सरकारला दिला आहे. 

 31 डिसेंबर पर्यंत सरकारला अल्टीमेटम

मुबलक नैसर्गिक साधन सुविधां असूनही केवळ राज्यकर्त्यांच्या स्वार्थापोटी विदर्भाची वाताहत सुरू आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, नक्षलवादामुळे विदर्भ ओसाड झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्य मिळावे म्हणून गेल्या बुधवार, 27 डिसेंबरपासून नागपूरच्या संविधान चौक तसेच बुलडाणा येथे आमरण उपोषण केले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात काही विदर्भवाद्यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वयोवृद्ध विदर्भवादी कार्यकर्ते गेले चार दिवस आंदोलन करत असतांना सरकारने अजूनही आमच्या आंदोलनाची साधी दखल घेतलेली नाही. त्यामुळे विदर्भावाद्यांच्या मनात सरकार विरुद्ध रोष असल्याचे बघायला मिळत आहे. संविधानिक पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने हे उपोषणाचे शस्त्र हाती घेतले आहे. 31 डिसेंबर पर्यंत आम्ही उपोषणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन करू. तोपर्यंत सरकारला अल्टीमेटम आहे. मात्र, त्यानंतर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून गनिमीकावा करत मोठे पाऊल उचलले जाईल, असा इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे.

मागणीला गावागावांतून नागरिकांचे समर्थन

वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी ही गेल्या 118 वर्षांपासूनची आहे. मिशन 2023 च्या अंतिम टप्प्यातील हे आमचे आंदोलन असून 31 डिसेंबर पर्यंत आम्ही उपोषणाचे हत्यार वापरले आहे. विदर्भाला सुजलाम् सुफलाम् बनवायचे असेल, तर येत्या  31 डिसेंबरपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा अशी, अशी मागणी आम्ही केली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही नागपूरच्या संविधान चौकात गेल्या  27 डिसेंबरपासून आमरण उपोषण करत आहोत.  या आंदोलनाला विदर्भातील गावागावांतून नागरिकांचे समर्थन मिळत आहे. हे आंदोलन आता मागे घेतले जाणार नाही. शेंडी तुटो की पारंबी, अशी आमची भूमीका असल्याची  प्रतिक्रिया  माजी आमदार आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिली. 

 या आहेत प्रमुख मागण्या

1) केंद्र सरकाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तत्काळ निर्माण करावे
2) विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी आणि शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडींग बंद करावे.
3) विदर्भात येऊ घातलेले दोन्ही औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाबाहेर न्यावे.
4) वैधानिक विकास मंडळ नको, विदर्भ राज्यच हवे.
5) अन्नधान्यावरील G.S.T. तात्काळ रद्द करावा
6) आष्टी ते आलापल्ली-सुरजागढ हा रस्ता सिमेंट कॉक्रीट मध्ये बांधण्यात यावा.
7) बल्लारपुर-सुरजागढ रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
8) खामगांव-जालना रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
9) बडनेरा-कारंजा-मंगरुळपीर-वाशिम रेल्वेमार्गास केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
10) आर्वी-पुलगांव (शकुंतला) रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये तात्काळ रुपांतर करण्यात यावे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या पोटतलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटतलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमच्या पोटतलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटतलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Embed widget