एक्स्प्लोर

Swabhimani Shetkari Sanghatna महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार?

कोल्हापुरात 5 एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर : माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापुरात 5 एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान स्वाभिमानीची वाटचाल भाजपशी युती होण्याच्या दिशेने होऊ शकते.

राजू शेट्टी सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक धोरणांना विरोध करत आहेत. वीज मिळावी या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको करत राज्य सरकारचा निषेध केला होता. शिवाय कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का? अशी जहरी टीकाही केली होती. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वरुड-मोर्शी मतदारसंघाचे 'स्वाभिमानी'चे एकमेव आमदार देवेंद्र भुयार निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्कात नाही. 24 मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर हे वरुड-मोर्शीतील हिवरखेड इथे सभा घेणार आहेत. सभेच्या पोस्टरवर देवेंद्र भुयार यांचे नाव नाही आणि त्यांना सभेचे निमंत्रण नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे 24 मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर आमदार भुयारांच्या मतदारसंघात काय तोफ डागतात याकडे लक्ष लागलं आहे. 

सत्तेतून बाहेर पडण्याची ही असू शकतात कारणे!
•  दिवसा वीज मिळावी यासाठी राजू शेट्टी 14 दिवस कोल्हापूरला धरणे आंदोलनाला बसले पण सरकारने विशेष दखल घेतली नाही, हे राजू शेट्टींच्या जिव्हारी लागले.
• केंद्र सरकारने भूसंपादनाला पाच पट मोबदल्याचा कायदा दोन पटीवर आणला आहे. 
• कर्जमाफी, पीकविमा, दिवसा वीज या मुद्द्यावर बाहेर पडू शकतात. ऊस उत्पादकांच्या एफआरपीचे राज्य सरकारने तुकडे केले. 
• शरद पवार यांच्यासोबत जाण्याने राजू शेट्टींचा पराभव झाला, जनमत विरोधात गेले, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. 
• स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांसोबत हातमिळवणी केलेली लोकांना आवडली नाही. 
• केंद्र सरकारविरोधी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात राजू शेट्टीचा सक्रीय सहभाग नव्हता. मग भाजपाशी आतून संपर्कात होते का? असाही सवाल विचारला जातोय 
• भाजपालाही स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत हवी आहे. 
• 'स्वाभिमानी'च्या नेत्यांची आणि भाजपची गोपनीय बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. 
• राजू शेट्टी यांच्याकडून वारंवार महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. 
• भविष्यात 'स्वाभिमानी' भाजप सोबत गेल्यास राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविंकात तुपकर एकाच व्यासपीठावर दिसल्यास नवल वाटू नये.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget