एक्स्प्लोर

Nagpur : पक्ष वाढवायचा की मोदींचे भूत उतरवायचं हे ठरवा आणि एकत्र या, अन्यथा आम्ही एकटे लढू; प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला इशारा

VBA Prakash Ambedkar : आम्हाला जर कुणी सोबत घेतले नाही तर आम्ही लढू आणि जिंकूही असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

नागपूर: मोदी नावाचे भूत उतरवायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एक दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील पण एकीने लढलं पाहिजे असं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केलं आहे. ते नागपुरात बोलत होते. प्रकाश आंबेडकर हे विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये जाण्यास उत्सुक असून अद्याप त्याचा निर्णय झाला नाही.

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी 'अ‍ॅक्टिव्ह मोड' वर आली असून ठिकठिकाणी सभा, मेळावे घेण्याचे काम सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात सोमवारी झालेल्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडत भाषण केलं. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीला कुठल्या पक्षाने सोबत घेतले तर ठीकच अन्यथा, एकटा चलो रे चा नारा देत कार्यकर्त्यांना तयारीला लागा असे देखील सांगितले. त्या  56 इंच छातीमध्ये केवळ गाठी आणि फाफडा आहे. मात्र तुम्ही आमच्या सोबत आलात तर आम्ही आमचे डोकं तुम्हाला देऊ. 

यावेळी संघावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण आज ज्या नागपुरात आहोत, त्यांच नागपुरात 50 वर्षाआधी आम्ही संविधान मनात नाही, संधी मिळताच आम्ही हे संविधान उलथून लावल्याशिवाय राहणार नाही असे बोलले गेले आहे. नागपुरात पार पडलेल्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेच्या मांचावरून प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

पक्ष वाढवायचा आहे, की मोदींना घालवायचं आहे हे ठरवा- प्रकाश आंबेडकर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडीतील इतर पक्ष असतील त्यांना आम्ही मदत करायला निघालो आहोत. हे प्रतीक्रांतीचे भूत नागपूरातून निघाले आहे. त्याला गाडायला आम्ही  निघालो आहे. मात्र दुर्दैवाने ते मलाचा गाडायला निघाले आहे अशी आजची परिस्थिती आहे. मात्र उद्या काय होईल ते सांगता येत नाही. कोणी 30 जागा लढवणार, कोणी 23 जागा लढवणार, असे बोलले जात आहे. मात्र कुणीही जागा सोडायला तयार नाही. त्यांना मी म्हणेन की आधी बसलेले मोदीचे भूत उतरवा. आता तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे, की मोदींना घालवायचं आहे हे ठरवा. मोदींना घालवायचं असेल तर दोन तीन जागा कमी आल्या तरी हरकत नाही. मात्र मोदी नावाचे भूत एकदा का तुमच्या बोकांडी बसले तर मग तुम्ही तिहारच्या तुरूंगात गेल्या शिवाय राहणार नाही अशी उपहासात्मक टीका देखील प्रकाश आंबेडकरांनी केली. 

आपल्या विचरांचे वर्चस्व, तोपर्यंत आपली क्रांती यशस्वी 

विषमता, गुलामी, अन्याय अत्याचार हवा असेल तर मग विभक्तपणा हा त्याचा आधार आहे. विभक्तपणा आला तर आपण एकमेकांना कमी लेखतो. ही क्रांती आपण सुरू केली ती मानवतेची क्रांती आहे. विभक्त विरुद्ध एकता प्रस्थापित करण्यासाठी आहे. विभक्तपणामध्येच या देशाची गुलामी आहे. देशातील आताचा लढा हाच आहे असे मी मानतो. मनुस्मृती लागू झाली ती मंदिरातून लागू झाली. मात्र तिच्या जागी जो नवा कायदा आला तो संविधानाच्या रूपाने. हा कुठल्या मंदिरातून आला नाही, तर तो या देशाच्या संसदेतून आले आहे, संविधान सभेतून आला. सत्तेचे केंद्र आज मंदिर नसून संसद आहे. शिवाजी महाराज राजे होते. मात्र धर्माने मान्यता नव्हती, म्हणून गागाभटांनी शिवराज्याभिषेक करून त्यांना मान्यता दिली. धर्म त्यावेळी मान्यता देता होता. त्यावेळी सेंटर ऑफ पॉवर हा धर्म होता. मात्र आताची सेंटर ऑफ पॉवर हा धर्म, मंदिर, देवळे नाही तर संसद आहे. संसदेवर ज्याचा ताबा आज त्याची व्यवस्था. त्यामुळे संसद आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे. ज्या दिवशी या विचारांचा पराभव होईल त्या दिवशी आपली देखील हार आहे असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम,थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर, जाणून घ्या सविस्तर
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...,1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर
Chandrababu Naidu : वक्फ संपत्तीचे टीडीपीकडून नेहमीच संरक्षण, भविष्यात सुद्धा करणार; चंद्राबाबू नायडूंचा मुस्लीम बांधवांना शब्द!
वक्फ संपत्तीचे टीडीपीकडून नेहमीच संरक्षण, भविष्यात सुद्धा करणार; चंद्राबाबू नायडूंचा मुस्लीम बांधवांना शब्द!
Prashant Koratkar :  कोल्हापुरात फेटा आणि कोल्हापुरी पायताण देखील...;'चिल्लर' कोरटकरवर कोर्टात हल्ला करणाऱ्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया
कोल्हापुरात फेटा आणि कोल्हापुरी पायताण देखील...;'चिल्लर' कोरटकरवर कोर्टात हल्ला करणाऱ्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया
बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ  झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..
बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12.30 PM TOP Headlines 12.30 PM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 29 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम,थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर, जाणून घ्या सविस्तर
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...,1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर
Chandrababu Naidu : वक्फ संपत्तीचे टीडीपीकडून नेहमीच संरक्षण, भविष्यात सुद्धा करणार; चंद्राबाबू नायडूंचा मुस्लीम बांधवांना शब्द!
वक्फ संपत्तीचे टीडीपीकडून नेहमीच संरक्षण, भविष्यात सुद्धा करणार; चंद्राबाबू नायडूंचा मुस्लीम बांधवांना शब्द!
Prashant Koratkar :  कोल्हापुरात फेटा आणि कोल्हापुरी पायताण देखील...;'चिल्लर' कोरटकरवर कोर्टात हल्ला करणाऱ्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया
कोल्हापुरात फेटा आणि कोल्हापुरी पायताण देखील...;'चिल्लर' कोरटकरवर कोर्टात हल्ला करणाऱ्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया
बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ  झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..
बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..
Anjali Damania on Santosh Deshumukh Case : पीआय महाजन, बनसोडे संपूर्ण कटात सामील, धनंजय मुंडेंनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलं; अंजली दमानियांचा गंभीर आरोप
पीआय महाजन, बनसोडे संपूर्ण कटात सामील, धनंजय मुंडेंनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलं; अंजली दमानियांचा गंभीर आरोप
Jallianwala Bagh massacre : हा आमच्या साम्राज्यावर लागलेला डाग! जालियनवाला बाग हत्याकांडावर सरकारने भारताची माफी मागावी; ब्रिटीश खासदाराची संसदेत मागणी
हा आमच्या साम्राज्यावर लागलेला डाग! जालियनवाला बाग हत्याकांडावर सरकारने भारताची माफी मागावी; ब्रिटीश खासदाराची संसदेत मागणी
पोतीच्या पोती भरून जळालेल्या नोटा घरच्या स्टोअर रुममध्ये सापडल्या; 'नोटसम्राट' न्यायमूर्तींची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर याचिका फेटाळली
पोतीच्या पोती भरून जळालेल्या नोटा घरच्या स्टोअर रुममध्ये सापडल्या; 'नोटसम्राट' न्यायमूर्तींची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर याचिका फेटाळली
Nashik News : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पंतप्रधान किसान योजनेचे 181 ‘बांगलादेशी’ लाभार्थी, सोमय्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पंतप्रधान किसान योजनेचे 181 ‘बांगलादेशी’ लाभार्थी, सोमय्यांच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
Embed widget