एक्स्प्लोर

'आयातां'मुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात : नितीन गडकरी

भाजपमध्ये आयात उमेदवारांमुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा'च्या 'विचारसंहिता' कार्यक्रमांतर्गत दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

नागपूर : इतर पक्षातून भाजपमध्ये आयात झालेल्या उमेदवारांमुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा'च्या 'विचारसंहिता' कार्यक्रमांतर्गत दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. ताकदवान असून दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवारांना घेऊन निष्ठावंत दुखावतात याबाबत प्रश्न केल्यावर गडकरी म्हणाले की, जो मतदारसंघ जिंकायला अवघड आहे तिथे आम्ही हा प्रयोग केला. त्याचे पक्षांतर्गत पडसाद उमटले. मात्र निवडणूक जिंकायची असेल तर तडजोडी कराव्या लागतात, असे नितीन गडकरी म्हणाले. मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू पाच वर्ष आम्ही जे काम केले त्याचे परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे ही निवडणूक आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले. मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पंतप्रधान असतील, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे, असेही ते म्हणाले. चौकीदार हा कॅम्पेनचा प्रकार आहे. चौकीदार म्हणण्यात काही गैर नाही, असेही त्यांनी सांगितले. माझं खाण्यावर प्रेम आहे, मात्र एकावेळी जास्त खात नाही : नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. पट्टीचे खवय्ये म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या खाण्याच्या अनेक दंतकथा आहेत. याविषयी नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास उत्तरं दिली. मी खाद्य प्रेमी आहे मात्र मी एकाच वेळी खूप जास्त कधी खात नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्या 'खूप' खाण्याबाबत असलेल्या दंतकथेविषयी प्रश्न केला असता ते म्हणाले की, मी एकावेळी खूप जास्त खात नाही, असे ते म्हणाले.  खाण्याच्या प्रेमापोटी दिल्लीतील ऑफिसच्या माळ्यावर गार्डन रेस्टारंट तयार केले असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.  कॅबिनेटमध्ये नवीन पदार्थ आल्यावर मोदीजी सांगतात, नितीनजी का सुझाव है, असा किस्साही त्यांनी सांगितला. यावेळी बजेटनंतर निवडणुकीला सामोरे कसे जाणार याविषयी विचारले असता ते म्हणाले की,  बजेटनंतर आम्हाला फायदा झाला आहे, आम्ही ताकदवान झालो आणि यामुळेच सर्व विरोध पक्ष एक झाले असे, नितीन गडकरींनी सांगितले. यावेळी पुलवामानंतर निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची भावना ओसरत असल्याने निवडणूक ग्रामीण प्रश्नांभोवती केंद्रित झाली आहे, हे तुम्हाला अडचणीचे ठरेल काय? असा प्रश्न केला असता गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर इथे सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. देशात पहिल्यांदाच 20 हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचन योजनेत मिळाले. राज्यात 26 सिंचन प्रकल्पांची कामे 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागाकरिता 108 प्रकल्प बळीराजा योजनेच्या अंतर्गत सुरु केले आहेत. पाच लाख कोटी रुपयांचे रस्ते मी बांधले आहेत. पुणे, कोल्हापूर रस्ता सहापदरी, मुंबई-गोवा रस्ता चारपदरी करण्याचे काम सुरु आहे. अशी अनेक कामे ग्रामीण भागासाठी सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत जाती-धर्माच्या मुद्द्यावरून केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी फॉर्म भरताना 50 हजार लोकं उपस्थित होती. त्यात माझ्या जातीचे 500 लोकही नसतील, आम्ही जात पाहत नाहीत, असे सांगत विकासाला नजरेआड करता येत नाही असे, गडकरी म्हणाले. नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारांना धक्का बसला असल्याचेही या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरींच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे - भाजप हा कोणत्याही एका व्यक्तीचा पक्ष नाही - पाच वर्ष आम्ही जे काम केले त्याचे परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे ही निवडणूक -  धोक्याची घंटा नाही, अपवाद वगळता आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या - जोशी, अडवाणीजी यांच्याविषयी सन्मान कायमच, प्रत्येक क्षेत्रात पिढी बदलत असते - मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पंतप्रधान असतील - मी अर्थमंत्री नाही, होण्याची शक्यताही नाही. - जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे - चौकीदार हा कॅम्पेनचा प्रकार आहे. चौकीदार म्हणण्यात काही गैर नाही

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, चालकाला अटक 
नागपुरात भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, चालकाला अटक 
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Devendra Fadnavis : डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Embed widget