एक्स्प्लोर

'आयातां'मुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात : नितीन गडकरी

भाजपमध्ये आयात उमेदवारांमुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा'च्या 'विचारसंहिता' कार्यक्रमांतर्गत दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

नागपूर : इतर पक्षातून भाजपमध्ये आयात झालेल्या उमेदवारांमुळे पक्षांतर्गत पडसाद उमटले, मात्र निवडणूक जिंकायची तर तडजोडी कराव्या लागतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 'एबीपी माझा'च्या 'विचारसंहिता' कार्यक्रमांतर्गत दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. ताकदवान असून दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवारांना घेऊन निष्ठावंत दुखावतात याबाबत प्रश्न केल्यावर गडकरी म्हणाले की, जो मतदारसंघ जिंकायला अवघड आहे तिथे आम्ही हा प्रयोग केला. त्याचे पक्षांतर्गत पडसाद उमटले. मात्र निवडणूक जिंकायची असेल तर तडजोडी कराव्या लागतात, असे नितीन गडकरी म्हणाले. मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू पाच वर्ष आम्ही जे काम केले त्याचे परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे ही निवडणूक आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले. मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पंतप्रधान असतील, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे, असेही ते म्हणाले. चौकीदार हा कॅम्पेनचा प्रकार आहे. चौकीदार म्हणण्यात काही गैर नाही, असेही त्यांनी सांगितले. माझं खाण्यावर प्रेम आहे, मात्र एकावेळी जास्त खात नाही : नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. पट्टीचे खवय्ये म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या खाण्याच्या अनेक दंतकथा आहेत. याविषयी नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास उत्तरं दिली. मी खाद्य प्रेमी आहे मात्र मी एकाच वेळी खूप जास्त कधी खात नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्या 'खूप' खाण्याबाबत असलेल्या दंतकथेविषयी प्रश्न केला असता ते म्हणाले की, मी एकावेळी खूप जास्त खात नाही, असे ते म्हणाले.  खाण्याच्या प्रेमापोटी दिल्लीतील ऑफिसच्या माळ्यावर गार्डन रेस्टारंट तयार केले असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.  कॅबिनेटमध्ये नवीन पदार्थ आल्यावर मोदीजी सांगतात, नितीनजी का सुझाव है, असा किस्साही त्यांनी सांगितला. यावेळी बजेटनंतर निवडणुकीला सामोरे कसे जाणार याविषयी विचारले असता ते म्हणाले की,  बजेटनंतर आम्हाला फायदा झाला आहे, आम्ही ताकदवान झालो आणि यामुळेच सर्व विरोध पक्ष एक झाले असे, नितीन गडकरींनी सांगितले. यावेळी पुलवामानंतर निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची भावना ओसरत असल्याने निवडणूक ग्रामीण प्रश्नांभोवती केंद्रित झाली आहे, हे तुम्हाला अडचणीचे ठरेल काय? असा प्रश्न केला असता गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर इथे सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. देशात पहिल्यांदाच 20 हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचन योजनेत मिळाले. राज्यात 26 सिंचन प्रकल्पांची कामे 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागाकरिता 108 प्रकल्प बळीराजा योजनेच्या अंतर्गत सुरु केले आहेत. पाच लाख कोटी रुपयांचे रस्ते मी बांधले आहेत. पुणे, कोल्हापूर रस्ता सहापदरी, मुंबई-गोवा रस्ता चारपदरी करण्याचे काम सुरु आहे. अशी अनेक कामे ग्रामीण भागासाठी सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत जाती-धर्माच्या मुद्द्यावरून केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी फॉर्म भरताना 50 हजार लोकं उपस्थित होती. त्यात माझ्या जातीचे 500 लोकही नसतील, आम्ही जात पाहत नाहीत, असे सांगत विकासाला नजरेआड करता येत नाही असे, गडकरी म्हणाले. नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारांना धक्का बसला असल्याचेही या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरींच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे - भाजप हा कोणत्याही एका व्यक्तीचा पक्ष नाही - पाच वर्ष आम्ही जे काम केले त्याचे परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे ही निवडणूक -  धोक्याची घंटा नाही, अपवाद वगळता आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या - जोशी, अडवाणीजी यांच्याविषयी सन्मान कायमच, प्रत्येक क्षेत्रात पिढी बदलत असते - मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पंतप्रधान असतील - मी अर्थमंत्री नाही, होण्याची शक्यताही नाही. - जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे - चौकीदार हा कॅम्पेनचा प्रकार आहे. चौकीदार म्हणण्यात काही गैर नाही
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Nanded Crime: सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget