एक्स्प्लोर

Sammruddhi Mahamarg :समृद्धी महामार्गाला वृक्षारोपणामुळे ब्रेक लागणार? वृक्षारोपणावर प्रशासनाचे दुर्लक्ष; पर्यावरणवाद्यांचं थेट पंतप्रधानांना साकडं

समृद्धी महामार्ग वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार समृद्धी 'वाद' मार्ग ठरतोय. कधी महामार्गावरुन हरणं धावतात तर कधी उद्घाटनअगोदर मंत्र्यांची गाडी धावते हे वाद मिटत नाही तोवर वृक्षारोपणाचा नवा वाद उफाळून आला आहे.

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं (Sammruddhi Mahamarg) उद्घाटन कधी होणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागले आहे.  मात्र, या महामार्गावर आवश्यक असलेलं वृक्षारोपणच झालेलं नाही. यामुळे वृक्षारोपण झाल्याशिवाय समृद्धी महामार्ग सुरु करू नये अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधानांकडे केली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर खुला होण्यासाठी आणखी विलंब लागू शकतो 

समृद्धी महामार्ग वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार समृद्धी 'वाद' मार्ग ठरतोय. कधी महामार्गावरुन हरणं धावतात तर कधी उद्घाटनअगोदर मंत्र्यांची गाडी धावते हे वाद मिटत नाही तोवर वृक्षारोपणाचा नवा वाद उफाळून आला आहे. समृद्धी महामार्गावर साडे सात लाख वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या मेलमध्ये त्याचीच आठवण पर्यावरणवाद्यांनी करून दिली आहे. पंतप्रधानांनी वृक्षारोपण झाल्याशिवाय महामार्गाचे उद्घाटन करू नये असे आवाहन पर्यावरणवाद्यांनी ही इमेलमध्ये करण्यात आले आहे. 

पर्यावरणवाद्यांनी केलेल्या आरोपानंतर  एबीपी माझाने समृद्धी महामार्गावर वृक्षारोपण झालंय की नाही याची खातरजमा केली. पण समोर चित्र मात्र वेगळेच आले आहे. महामार्गासाठी झाडांची कत्तल केली मात्र तिथे अद्याप वृक्षारोपण केलं नाही. समृद्धी महामार्ग लगत मुंबईपासून नागपूरपर्यंत गॅसची पाईपलाईन टाकायची आहे. त्याचे काम सुरु झाले असून ते संथ गतीने सुरु आहे.  त्यामुळे ती पाईपलाईन टाकल्याशिवाय केलेले वृक्षारोपण वाया जाणार अशी भीती आहे.  म्हणून वृक्षारोपण केले नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

फक्त गॅस पाईपलाईन हाच वृक्षारोपणाला अडथळा नसून भविष्यातला बुलेट ट्रेन प्रकल्पही त्याला तितकाच कारणीभूत आहे. त्यामुळे एका बाजूला गॅस पाईपलाईन आणि दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनचा प्रकल्प आला . तर लाखो झाडं लावायची कुठे? हाच प्रश्न उपस्थित करत पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधानांना साकडे घातलंय. त्यामुळे  हा मुद्दा कोणत्या वळणावर येवून थांबतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget