एक्स्प्लोर

Maharashtra Congress : "ज्यांना सोडून जायचंय त्यांनी लवकर जावं, कारण..."; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचे मोठे विधान

Congress News : काँग्रेस पक्षातून इतर पक्षामध्ये होणाऱ्या पक्षांतरावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महत्वपूर्ण विधान करत खोचक सल्ला दिला आहे.

Nagpur News नागपूर : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात असतानाच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा, दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष सोडून जाणाऱ्यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे  (Maharashtra Congress) प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महत्वपूर्ण विधान करत खोचक सल्ला दिला आहे.

ज्यांना सोडून जायचं त्यांनी लवकर जावं.. 

राजकीय पक्षामध्ये आम्ही पक्ष आणि सत्तेसाठी लढत नाही. एक आदर्श विचारासाठी आम्ही पक्षात काम करत असतो. मात्र काही लोकांना पद नसले की ते निघून जातात. या जाणाऱ्या लोकांमुळे काँग्रेस पक्षाचे फार काही नुकसान होणार नाही. महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून महाराष्ट्रातून कोणी जाणार नाही. पक्ष एका आदर्शावर काम करतो आणि जो कार्यकर्ता या आदर्शावर चालत असतो तो पक्ष सोडून कधीही जाणार नाही, असा माझा विश्वास आहे.

ज्यांना जायचंच असेल त्यांनी लवकर जावं, असा सल्ला रमेश चेन्निथला यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीसीसी एक्झिक्यूटिव्ह महाराष्ट्रातील सहा विभागामध्ये काँग्रेसच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिली बैठक गुरुवारी 18 जानेवारीला विदर्भातील अमरावती येथे होत आहे. या बैठकीसाठी रमेश चेन्निथला नागपूरला आले असता त्यांनी हे भाष्य केले आहे.  

जागावाटपाची अंतिम यादी लवकरच 

काँग्रेसचे संघटन मजबूत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी तसेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकांचे आयोजन केले आहे. त्याकरिता आम्ही पहिल्यांदा आदिवासी भागामध्ये जाऊन बैठक घेणार आहोत. शहरात नेहमीच बैठका होतात. म्हणून यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जात आहोत. त्याची सुरुवात विदर्भातून होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसोबत चर्चा झालेली आहे. येणाऱ्या दिवसात कोणाला किती जागा दिल्या जाईल यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकांना पुढे जाऊ. याबाबत सर्व मित्र पक्षासोबत बऱ्यापैकी सहमती झालेली आहे. येणाऱ्या दिवसात अंतिम यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.  

भाजप, आरएसएसकडून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. यावर रमेश चेन्निथला यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, हिंदू धर्माची प्रामाणिकता सांगणारे चार शंकराचार्य जर त्या राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी जाणार नसतील तर तुम्ही आम्हाला का हा प्रश्न विचारता? ते म्हणतात हा राजकीय कार्यक्रम झालेला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते जर उद्घाटन होणार असेल तर हे काय राजकारण नाही का?  प्रभूश्रीरामाला आम्ही मानतो, तेव्हा आम्ही हजारोंच्या संख्येत जाऊ. मात्र हे सगळं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा घेण्यासाठी सुरू आहे. त्याला आम्ही सहमत देत नाही. भाजप आणि आरएसएसकडून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इव्हेंट मॅनेजमेंटचे काम सुरू असल्याची टीका देखील रमेश चेन्निथला यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? थोरात-पटोले वादावर एक सदस्यीय समिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Hearing Kolhapur : दुसऱ्या दरवाजाने कोरटकर कोर्टात, शिवप्रेमी संतप्त, पायताण देऊन घोषणाABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 25 March 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Embed widget