एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg : देवेंद्रजी गाडी चालवत होते, पोटातलं पाणीही हलत नव्हतं; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर सांगितला 'टेस्ट राईड'चा अनुभव

CM Eknath Shinde on Samruddhi Mahamarg: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर टेस्ट राई़ड घेतली तेव्हा आपण बाजूला बसलो होते, महामार्गावर प्रवास करताना  पोटातलं पाणीही हलत नव्हतं तो अनुभवही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितला.

CM Eknath Shinde on Samruddhi Mahamarg: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पणाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आले, त्याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. आनंद याचाही आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. त्यामुळे मी या महामार्गाचे काम करू शकलो. आज आम्ही दोघे एकत्र असताना समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते. त्यावेळचा एक अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला. ते म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गाडी चालवली असताना आपण बाजूला बसलो होतो, महामार्गावर प्रवास करताना पोटातलं पाणीही हलत नव्हतं.", असं ते म्हणाले. 


Samruddhi Mahamarg : देवेंद्रजी गाडी चालवत होते, पोटातलं पाणीही हलत नव्हतं; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर सांगितला 'टेस्ट राईड'चा अनुभव

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "या महामार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले, याचा आनंद फार मोठा आहे. आम्हीच काम सुरू केले आणि आमच्याच कारकिर्दीमध्ये लोकार्पण करतोय, ही भाग्याची गोष्ट आहे. भूमी अधिग्रहणामध्ये अनेकांनी अडचणी आणल्या. पण मोपलवार, गायकवाड, परदेशी आदी सर्व अधिकाऱ्यांच्या साथीने आम्ही त्यावर मात केली. शेतकऱ्यांना विश्‍वास दिला, आरटीजीएसच्या माध्यमातून तात्काळ पैसा त्यांच्या खात्यात जमा केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास आम्ही जिंकला. त्यामुळे पुढचे काम सुरू झाले. हा इको फ्रेंडली रस्ता आहे. 35 लाख झाडे लावणार आहोत. 250 मेगाव्हॅट सोलर वीज तयार करतोय. 12 तलाव, नद्या, नाल्यांचे खोदकाम केले. 8 ते 10 महिन्यांत मुंबईपर्यंत रस्ता पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

समृद्धी फक्त महामार्ग नव्हे तर गेमचेंजर

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा फक्त हायवे नाही, तर गेमचेंजर आहे. महाराष्ट्राची नवी लाईफलाईन बनणार आहे. दोन्ही बाजूंना इंडस्ट्रीज, नगर वसवणार आहोत. लाखो लोकांना रोजगार देणारा हायवे म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जाणार आहे. देशातील सर्वांत लांब हायवे आहे. आम्ही पाहणी करायला आलेलो असताना देवेंद्र फडणवीसांनी गाडी चालवली, मी बाजूला बसलो होतो. तेव्हा पोटातले पाणीही हलत नव्हते, असा अनुभव मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला. 

ही बातमी देखील वाचा

Nagpur Weather : नागपूर गारठलं; पारा 9.9 अंशांवर; विदर्भातील जिल्ह्यांच्या तापमानात लक्षणीय घट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Public Charge Rule: 'लठ्ठ, मधुमेहींना US व्हिसा नाही?', Trump प्रशासनाच्या नव्या नियमांनी भारतीयांची चिंता वाढली
Pawar Politics: थोरल्या भावाचे प्रताप धाकट्याला भोवले? Jay Pawar यांच्या उमेदवारीवर Ajit Pawar यांचे मोठे विधान
Lonar Lake Threat: '...मासे पाण्यात येणं हा पर्यावरणाला प्रचंड धोका आहे,' तज्ज्ञांचा इशारा
WhatsApp Security: हॅकर्सना बसणार दणका! एका क्लिकवर खाते होणार सुरक्षित, येतंय ‘Strict Account Setting’
Pune Crime: 'दृश्यम ४ वेळा पाहिला', Samir Jadhav ने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी Anjali ला भट्टीत जाळले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget