एक्स्प्लोर

Dharavi Redevelopment: धारावी पुनर्विकासाच्या विरोधात अंबादास दानवे आणि वर्षा गायकवाड यांचे जोरदार आंदोलन; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झळकावले अदानी-मोदानी हटावचे बॅनर

Ambadas Danve on Dharavi Redevelopment : मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावर अंबादास दानवे आणि वर्षा गायकवाड यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधान भावनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

Ambadas Danve on Dharavi Redevelopment : मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या (Dharavi Redevelopment)  मुद्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ((Ambadas Danve)) आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जोरदार घोषणाबाजी करत विधान भावनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. अदानीला आंदण देण्याचे काम सरकार करत आहे. मुंबई आणि त्यातल्या त्यात धारावीमध्ये हजारो लघु उद्योग आहेत. तेथील लोक पूर्णपणे या उद्योगावर अवलंबून असतांना ही धारावी अदानीच्या घश्यात घालण्याचे काम  राज्य सरकार करत आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खाते बदल होत असतांना शेवटच्या दिवशी धारावीच्या सर्व टेंडरवर सह्या केल्या आहे. जवळ जवळ धारावीच्या 70 हजार लोकांना घरे मिळतील की नाही ही शंका आहे. असे असतांना TDR ची मालकी आदानीकडे दिली जाते. सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे, की आदानीचे दलाल आहे? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. ते नागपुरात बोलत होते.  

अदानी-मोदानी हटाव, धारावी बचाव

मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्याला विरोध दर्शवत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधान भावनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी अदानी-मोदानी हटाव, अदानीला सुटलीय धारावीची हाव, धारावीकर म्हणताय अदानी चले जाव!, आज धारावी, उदया मुंबई,  धारावी वाचवा, लघु उद्योग वाचवा, आदानीला सूट, धारावीची लूट अशा आशयाचे बॅनर झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज धारावीमध्ये हजारो लोक लघु उद्योग करत आहे.  धारावी पुनर्विकासाच्या नावावर सरकार आदानीच्या फायद्याचे काम करत असून येथील जनतेवर अन्याय करत आहे.  म्हणून या मुद्यावर आम्ही विधान भवनाच्या आत आणि बाहेर आमच्या लढा देत आहोत. दोन्ही सभागृहात या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातील आणि धारवीकरांना न्याय मिळवून दिला जाईल. असे अंबादास दानवे म्हणाले. 

 

सरकार हे आदानीचे दलाल आहे का ? - अंबादास दानवे 

 केंद्र सरकार मोदी-शाहच्या नेतृत्वात मुंबईवर अन्याय करत आहे. तसेच राज्यातले खोके सरकार, गद्दार सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे. त्यामुके धारावी आणि मुंबईवर होणार अन्याय महाविकास आघाडी कधीही सहन करणार नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या आता आणि बाहेर देखील आम्ही लढा देण्याचा निर्धार केला आहे. सरकार हे जनतेचे काम करण्यासाठी आहे, की आदानीचे दलाल म्हणून काम करत आहे ? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. 

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Congress Morcha: E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज, तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना सल्ला
AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज, तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना सल्ला
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget