एक्स्प्लोर

Water Shortage: बोरिवलीतील गोराई गावात पाण्याचा ठणठणाट; पाण्यासाठी रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव, आज सुनावणी

Water Shortage in Gorai Village: पाण्यासाठी बोरिवलीतील गोराई गावातील रहिवाशांनी चक्क उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडणार आहे.

Water Shortage in Gorai Village in Borivali West : मुंबई : बोरिवली पश्चिमेतील (Borivali West) गोराई गावात (Gorai Village) रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना (Inadequate Water Supply) करावा लागत आहे. याप्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली असून पालिकेनं सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर आज उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी होणार आहे. गोराई विलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या (Gorai Villagers Welfare Association) वतीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.  

एकीकडे लोकसभा निवडणुकांची धामधूम आणि दुसरीकडे पाणीटंचाई आणि दुष्काळाचं सावट. राज्यातील अनेक गावं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत. कित्येक किलोमीटरची पायपीट करुन पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी धडपड अनेक गावकऱ्यांची गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यापाड्यात, गावांप्रमाणेच मुंबईतील काही भागांतही भीषण पाणीटंचाई आहे. बोरिवली पश्चिमेतील गोराई गावातील रहिवाशांना पिण्याचं पाणी मिळेनासं झालं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चक्क गावकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष वाढलं असून मुंबईतील गोराईत रहिवाशांना पाणी मिळेनासं झालं आहे. याप्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून पालिकेनं सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. 

प्रकरण नेमकं काय? 

बोरिवली पश्चिमेतील गोराई गावात रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पाणी कमी दबावानं येत असून रहिवाशांचे हाल होत आहेत. 5 हजार कुटुंबं या ठिकाणी राहत असून सुमारे 2 हजार कुटुंबीयांकडे पाण्याचे नळ आहेत. मात्र, यातून पाणी येईनासं झालं आहे. गोराई विलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितलं की, "या ठिकाणी विहिरी आहेत; मात्र पाणी पिण्यास योग्य नाही, न्यायालयानं पालिकेला जास्त दाबानं पाणीपुरवठा करण्यास सांगितलं होतं. मात्र, तसं होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेनं पाण्याची समस्या सोडवावी. तसेच, टँकरनं पाणीपुरवठा करावा." न्यायालयानं हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली होती. आज याप्रकरणी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget