![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं : यशोमती ठाकूर यांचं ट्वीट
शरद पवार यांनी एका मुलाखतीत राहुल गांधी यांच्या भाष्य केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. "सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं," असं सूचक ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
![सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं : यशोमती ठाकूर यांचं ट्वीट Want a stable government, avoid talking about the Congress leadership, Yashomati Thakurs tweet सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं : यशोमती ठाकूर यांचं ट्वीट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/05165607/sharad-pawar_Adv.-Yashomati-Thakur-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. "सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं," असं ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री योशमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट म्हणजे सूचक इशाराच समजला जात आहे.
यशोमती ठाकूर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्ष म्हणून मी आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटते असेल तर काँग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका-टिप्पणी करणं टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्त्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे."
काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.@INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @bb_thorat
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 5, 2020
शरद पवार काय म्हणाले होते? एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय आहे? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर आज काँग्रेसमधली रँक आणि फाईलची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरु घराण्याची आस्था काँग्रेसजनांमध्ये आहे. सोनिया आणि राहुल त्याच घराण्यातील असल्यामुळे त्या पक्षातील बहुतांश लोक त्याच विचारसरणीचे आहेत, असं पवार म्हणाले. राहुल गांधींचं नेतृत्त्व मानायला तयार आहेत का असं विचारला असता पवार म्हणाले की, "त्यांच्यात कन्सिस्टन्सी कमी आहे."
Yashomati Thakur | सरकार स्थिर चालवायचं असेल तर काँग्रेस श्रेष्ठींवर बोलणं टाळा : यशोमती ठाकूर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)