एक्स्प्लोर

कल्याणमध्ये विकलांग कुष्ठरुग्णांचे लसीकरण, केडीएमसी ठरली राज्यातील पहिलीच महापालिका

केडीएमसी प्रशासनाने हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीतील 150 विकलांग कुष्ठरुग्णांचे कोरोना लसीकरण केले आहे.

कल्याण : एकीकडे सर्वसामान्यांना अद्याप कोविडची लस मिळत नसताना तिथे समाजातील विकलांग, कुष्ठरुग्णांचा कुणी विचार करत नाहीये. मात्र अशा विकलांग कुष्ठरुग्णांचे लसीकरण करणारी कल्याण डोंबिवली ही राज्यातील बहुधा पहिलीच महापालिका ठरली आहे. कल्याण पूर्वेतील हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये केडीएमसीतर्फे आज 150 विकलांग कुष्ठरुग्णांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.

सद्यस्थितीला राज्यात लसींचा तुटवडा असल्याने दररोज कोरोना लसीकरण सुरू ठेवणे महापालिकेला शक्य होत नाहीये. त्यात लस उपलब्ध असल्यास ती घेण्यापूर्वी टोकन घेणे आवश्यक आहे. मात्र आधीच कुष्ठरुग्ण आणि त्यातही विकलांग असणाऱ्या या व्यक्तींना हे सोपस्कार पाळणे म्हणजे जणू रोगापेक्षा इलाज भयंकर. मात्र त्यांची ही व्यथा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या गजानन माने यांनी केडीएमसी प्रशासनापर्यंत पोहोचवली. 

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. केवळ प्रतिसादच दिला नाही तर तो आज लगेच प्रत्यक्षातही उतरवला. या विकलांग कुष्ठरुग्णांना कोरोना केंद्रांवर येता येणं शक्य नसल्याने केडीएमसी प्रशासनाने थेट त्यांच्याच अंगणात हे कोरोना केंद्र नेले. आणि या हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीतील 150 विकलांग कुष्ठरुग्णांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.

अशाप्रकारे कुष्ठरुग्णांसाठी कोरोना लसीकरण उपक्रम राबवलेली कल्याण डोंबिवली ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. जिने 'शासन आपल्या दारी' ही शासकीय उक्ती खरी करून दाखवली. कल्याण डोंबिवलीप्रमाणे राज्यातील इतर स्थानिक संस्थांनीही असाच पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget