एक्स्प्लोर

पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाही; गोळीबार प्रकरणी यशोमती ठाकूरांची टीका

महाराष्ट्राचा तुम्ही जर बिहार कराल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही यशोमती ठाकूर म्हण्ल्यात. 

मुंबई : उल्हासनगरमधील (UlhasNagar Crime)  भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात आता विरोधकांकडून सरकारवर टीका होतांना पाहायला मिळत आहे. 'महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल, तर महाराष्ट्रची जनता तुम्हाला माफ करणार नाही. तर, पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाही असे म्हणत काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)  यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. 

पुढे बोलतांना यशोमती ठाकूर म्हणाल्यात की, "सर्व गुंडाराज सुरू आहे, महाराष्ट्राचा बिहार करायच्या दृष्टिकोनातून हे सर्व केल जात आहे. एकीकडे मुंबईच्या सर्व गोष्टी तुम्ही गुजरातकडे नेत असून, दुसरीकडे अशा गोष्टींना तुम्ही वाव देत आहे. या लोकांवर गुन्हे दाखल होत नाही आणि त्यांना अटक देखील केली जात नाही. हे पहिल्यांदाच असे घडत नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. आधीपण गोळीबारसारख्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रमध्ये असं कधीच झालं नाही जे आज घडलं आहे. या सर्व गोष्टींचा निषेध आहे. दुःख याचं आहे की, यांनी जी खिचडी महाराष्ट्रमध्ये चालवली आहे, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी अनबन सुरू आहे, त्याचा हे कारण आहे. गृहमंत्री तसे पटकन येतात प्रतिक्रिया देण्यासाठी, पण आज ते दिसत नाही. अशा गोष्टी सहन कशा केल्या जातात. महाराष्ट्राचा तुम्ही जर बिहार कराल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही ठाकूर म्हण्ल्यात. 

उल्हासनगर शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला

उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणी आता शिवसैनिकांचा विरोध वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्टेशनबाहेर आणि उल्हासनगर शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसैनिक हीललाईन पोलीस स्टेशनबाहेर जमत आहेत. तरम शिवसैनिकांचा विरोध वाढतोय त्या कारणास्तव सध्या पोलीस बंदोबस्त उल्हासनगरमध्ये सर्वत्र वाढवण्यात आलाय.

इतर महत्वाच्या बातम्या: 

कायदा सुव्यवस्था धाब्यावर अन् गुंड डोक्यावर; उल्हासनगर गोळीबार प्रकरणी शरद पवार गटाचा सरकारवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, जबाबदार कोण?Delhi Railway Station : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटनाABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 16 February 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सNew Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.