एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : 'भगवं वादळ' दिल्लीच्या तक्तावर आदळणार, महाराष्ट्रचं देशाची दिशा ठरवणार; उद्धव ठाकरेंची 'सिंहगर्जना'

Maharashtra Politics : भगवं वादळ दिल्लीच्या तक्तावर आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray Attack on BJP : भगवं वादळ दिल्लीच्या तक्तावर आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार, असं म्हणत शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दत्ता घोर्डे जे पैठण शिवसेनेचे नगराध्यक्ष होते. वैजापूरचे डॉ. राजेंद्र डोंगरे, संभाजीनगरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. शोएब हाशमी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. मंगळवारी मातोश्रीवर या सर्वांचा पक्षप्रवेश पार पडला, यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रचं देशाची दिशा ठरवणार

यावेळी ते म्हणाले की, गेले चार दिवस मी कोकण किनारपट्टी भागात कुटुंब संवादासाठी फिरत होतो. मागील चार दिवस मी कोकण किनारपट्टीवर दौऱ्याला होतो. कोरोना काळात राबवलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' यानुसार मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधत होतो. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे का, हे मी पाहतो आहे. महाराष्ट्र दौरा करून माझं कुटुंब माझ्यासोबत आहे का हे मला जाणून घ्यायचा आहे. महाराष्ट्रचं देशाची दिशा ठरवणार, असल्याचंही उद्धव ठाकरे यांन म्हटलं आहे.

दिल्लीच्या तक्तावर भगवं वादळ आदळणार

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दोन चक्रीवादळ येऊन गेली. आता हे तिसरं चक्रीवादळ येत आहे, हे भगवं वादळ आहे, जे दिल्लीच्या तक्तावर आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार आहे. काहींच्या मानत अजूनही प्रश्न आहेत की, महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आहे, पर्याय कुठे आहे. याला पर्याय म्हणून हुकूमशाही उघडून फेकायची असते.'

'मन की बात' पेक्षा 'जन की बात' वेगळी

भगवं वादळ दिल्लीला आदळणार, हे भगवं वादळ हुकूमशाहीची चिरफाड करणार आहे. हुकूमशाहीला पर्याय द्यायचा नसतो हुकूमशाही उकडून फेकून द्यायचे असतं. मातोश्री आणि त्यासोबतच दौऱ्यावर असताना अनेक भाजपचे लोक शिवसेनेसोबत येत आहेत. 'मन की बात' पेक्षा 'जन की बात' वेगळी आहे. जनतेची संकट वेगळीच आहेत. गेल्या 10 वर्षातील भाजपाचा भोंगळवाणा कारभार उघडा पडला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर घणाघात केला आहे.

'संतांच्या भूमीत गद्दारीला थारा नाही'

अनेक ठिकाणी गावागावात योजनाच पोहोचलेल्या नाहीत. हा भोंगळ कारभार संपवण्याठी सर्वजण शिवसेनेसोबत येत आहे. महाराष्ट्र आता यापुढे देशाची दिशा ठरवणार आहे, हुकूमशाहीला गाडणार आहे. मराठवाडा संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीत गद्दारीला थारा नसतो. मी रायगड, सिंधुदुर्ग फिरलो. जसं मी कोकणात फिरलो, तसा मी मराठवाड्यात सुद्धा तुम्हाला भेटायला येणार आहे, संभाजीनगर जालना आणि विदर्भात मी दौरा करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

एक-एक लोक शरण जात आहे, नितीश कुमार गेले आणखी काही जातील. जे लाचार आहेत, भेकड आहेत, त्यांनी जरुर जावं. पण, आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये भेकडांपेक्षा मर्द मावळे कित्येक पटीने जास्त आहेत.

महत्वाच्या इतर बातम्या : 

पुढचा मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिवसेनेचाच; सुषमा अंधारेंकडून भरसभेत 'गॅरंटी'

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांनी 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
Embed widget