एक्स्प्लोर

TRP Scam Case | टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामींना हायकोर्टाचा मोठा दिलासा

अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलेअर मीडियाची याचिका हायकोर्टानं दाखल करून घेतलीया प्रकरणाचा तपास 12 आठवड्यांत पर्ण करू, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाहीदरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची आवश्यकता भासल्यास तीन दिवस आधी तशी नोटीस देणं मुंबई पोलिसांना बंधनकारक. 28 जूनला हायकोर्टात होणार पुढील सुनावणी

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं बुधवारी दाखल करून घेत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. याप्रकरणाचा तपास आम्ही येत्या 12 आठवड्यांत पूर्ण करू अशी हमी मुंबई पोलिसांच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण आता 28 जूनपासून अंतिम सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं ठरवलं आहे. या दरम्यान अर्णब गोस्वामी यांना अटकेपासूनचा अंतरिम दिलासा राहणार नाही. मात्र, पोलिसांना त्यांना अटक करायची झाल्यास किमान 72 तास आधी तशी नोटीस बजावणं बंधनकारक राहणार आहे. जेणेकरून अर्णब गोस्वामी त्याविरोधात कोर्टात दाद मागू शकतील. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठानं हे निर्देश बुधवारी जारी केले आहेत.

अर्णब गोस्वामींविरोधात नेमका कितीकाळ तपास सुरू राहणार याला काही मर्यादा आहेत की नाही?, असा सवाल करत हायकोर्टानं मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. टीआरपी घोटाळा प्रकरणी दाखल एफआयआर आणि आरोपपत्रातही नाव नसतानाही अर्णब गोस्वामी आणि एआरजी मीडियाविरोधात कधीपर्यंत चौकशी करणार आहात?, आणखी किती काळ त्यांना केवळ संशयित आरोपी म्हणून ठेवणार आहात?, असे सवाल हायकोर्टानं मुंबई पोलिसांना विचारले आहेत. अश्याप्रकारे एखाद्यावर टांगती तलवार लावून ठेवणं योग्य आहे का? गेल्या तीन महिन्यांत जर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तुमच्याकडे कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही तर मग आम्ही त्यांना दिलासा का देऊ नये? असा सवालही यावेळी हायकोर्टानं उपस्थित केला. याप्रकरणी विशेष सरकारी वकीलांकडे कोणतीही ठोस उत्तरं उपलब्ध नसल्याबद्दल न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली होती.

आमच्याविरोधात तपासयंत्रणेकडे कोणताही पुरावा नाही, हाच आमचा मुख्य युक्तिवाद आहे. त्यामुळे आमची याचिका दाखल करून घेत आम्हाला दिलासा देण्यात यावा. अशी मागणी अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलेअर मीडियाच्यावतीनं युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी हायकोर्टाकडे केली होती. कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णब गोस्वीमींसह एआरजी आऊटलेअर समुहानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देत हा तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे चौकशीसाठी देण्याची मागणीही याचिकेत केली आहे. हा गुन्हा निव्वळ राजकिय हेतून प्रेरीत असून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली दाखल केल्याचाही याचिकेत आरोप आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cloud burst in Jammu: जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 10 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 10 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
Sunetra Pawar: पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली खंत, सुनेत्रा पवार यांचाही नाराजीचा सूर
पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण अजूनही प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली खंत
Dam Water Maharshtra: उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cloud burst in Jammu: जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 10 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 10 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
Sunetra Pawar: पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली खंत, सुनेत्रा पवार यांचाही नाराजीचा सूर
पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण अजूनही प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली खंत
Dam Water Maharshtra: उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
Home Loan : गृहकर्जाची ठरलेल्या वेळेपूर्वी परतफेड कशी करायची? तीन स्मार्ट पर्याय ज्यानं कर्ज लवकर संपेल अन् लाखो रुपयांची होईल बचत
गृहकर्जाची ठरलेल्या वेळेपूर्वी परतफेड कशी करायची? तीन स्मार्ट पर्याय ज्यानं कर्ज लवकर संपेल अन् लाखो रुपयांची होईल बचत
Ahilyanagar Crime : लॉकअपचे गज कापून पलायन, तब्बल पाच वर्ष पोलिसांना गुंगारा, अखेर पुण्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
लॉकअपचे गज कापून पलायन, तब्बल पाच वर्ष पोलिसांना गुंगारा, अखेर पुण्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
Devendra Fadnavis on BDD: मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
Nashik News : नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
Embed widget