एक्स्प्लोर

हायवेमुळे उल्हासनगरचे व्यापारी रस्त्यावर

मुंबई: व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमध्ये सध्या व्यापाऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. शहरातील शेकडो व्यापाऱ्यांनी शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गासाठी दुकानांची जागा दिली आहे. मात्र त्यांना त्याबदल्यात इंचभर बांधकामाचीही मुभा देण्यात आलेली नसून, परिणामी 50-50 वर्षांपासून स्वाभिमानानं व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्यांवर सध्या अक्षरश: दोन वेळच्या जेवणासाठी अश्रितासारखं रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. फाळणीच्यावेळी पाकिस्तानातून आलेल्या सिंधी बांधवांसाठी उल्हासनगर शहराची निर्मिती करण्यात आली. भारतात येताना अंगावरच्या कपड्यावर आलेल्या सिंधी समाजानं आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर व्यापारात मोठं यश मिळवलं. शहराच्या विकासासाठी हातभारही लावला. मात्र डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईनंतर हा व्यापारी अक्षरश: रस्त्यावर आला. उल्हासनगरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गासाठी रस्ता 100 फुटांचा करण्यात आला आणि यासाठी वर्षोनवर्ष दुकानं असलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांची जागा दिली. मात्र ज्या व्यापाऱ्यांवर उल्हासनगर शहर चालतं, ते उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांची रस्त्यात जितकी जागा गेली, तितकं बांधकाम दुकानाच्यावर करण्याची तोंडी मुभा त्यावेळचे महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून दिल्याचा दावा व्यापाऱ्यांचा आहे. दुर्दैवानं ही बांधकामं सुरू असतानाच हिरेंची बदली झाली आणि त्यांच्याजागी आलेले नवे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ही बांधकामं नियमबाह्य ठरवत त्यांना स्थगिती दिली. त्यामुळे शहर भग्नावस्थेत पडून आहे. खरा कहर मात्र यानंतर झाला. कारण निंबाळकर यांच्यानंतर आलेले महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी व्यापाऱ्यांनी माजी आयुक्तांच्याच शब्दावर केलेली ही बांधकामं सरसकट अनधिकृत ठरवत त्यावर कारवाई सुरू केली. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अक्षरश: रस्त्यावर बसून काम करण्याची वेळ आली आहे. आता उन्हाळ्यात चाललंय, पावसाळ्यात मात्र मुलांची पोटं कशी भरायची? अशा विवंचनेत सध्या हे व्यापारी आहेत. या सगळ्यावर आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे मात्र सरकारी उत्तर तयारच आहे. जे नियमबाह्य आहे, त्यावर कारवाई होणारच. मात्र आधीच्या आयुक्तांनी व्यापाऱ्यांना जो शब्द दिला होता, त्याचं काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. या सगळ्या परिस्थितीचं मूळ कारण म्हणजे व्यापाऱ्यांसाठी असलेल्या ठोस धोरणाचा अभाव. जे शहर व्यापा-यांवरच चालतं, किंबहुना शहरातून व्यापारी वजा केले, तर शहरात काहीही उरणार नाही, अशी परिस्थिती असताना मायबाप सरकार शहराच्या विकासासाठी जमिनी दिलेल्या या व्यापाऱ्यांना न्याय देतं का, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा
ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा
Uddhav Thackeray : घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली, लोभापायी तो गेला; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बच्चू कडूंवर बोलले
घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक झाली, लोभापायी तो गेला; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बच्चू कडूंवर बोलले
Chhagan Bhujbal: राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  
 लातूरच्या ट्युशन एरियावर प्रशासनाचा दणका, उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल तात्काळ बंद करण्याचे आदेश
Pune Rain : पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये : राज्य सामाईक परीक्षा कक्ष
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Embed widget