जालन्याच्या तरूणाने मुंबईत आयुष्य संपवलं; आरक्षणासाठी टोकाचं पाऊल, विनोद पाटील यांचा दावा
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला
![जालन्याच्या तरूणाने मुंबईत आयुष्य संपवलं; आरक्षणासाठी टोकाचं पाऊल, विनोद पाटील यांचा दावा Sunil Kawale Sucide in BKC Mumbai for Maratha Reservation Claimed vinod Patil Maratha Aarakshan Maharashtra जालन्याच्या तरूणाने मुंबईत आयुष्य संपवलं; आरक्षणासाठी टोकाचं पाऊल, विनोद पाटील यांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/e0d7baf3a75be0a31de33712eb9f1c4a169770045130094_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केला. सुनील कावळे (45 वर्ष) (Sunil Kawale) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालन्याचे (Sunil Kawale Jalna) रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे . मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही मूळची अंबड तालुक्यातील असून त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ सायन रुग्णालयमध्ये जाऊन मयत तरुणाचा कुटुंबाचा भेट घेणार आहेत.
सुसाईड नोट सापडली
सुनील बाबुराव कावळे यांच्या बॅगमध्ये पोलिसांना मोबाईला फोन आणि एक सुसाईड नोट सापडली आहे. नोटच्या शेवटी त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे. कावळे मुंबईत कधी आले त्यांच्यासोबत कोण होते? या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
विनोद पाटील यांचे आवाहन
आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
हे ही वाचा :
मनोज जरांगेंचे वादळ आता धडकणार पवारांच्या बालेकिल्ल्यात, प्रस्थापित मराठा नेत्यांना धक्के बसण्याची भीती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)