एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Suniel Shetty VIDEO : मुंबईत राहताय तर मराठीत बोललं पाहिजे, सुनील शेट्टीचा भावनिक संदेश, बाहेरुन आलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन

Suniel Shetty On Marathi : मुंबईत राहताना इथल्या मातृभाषेचाही आदर करणं आवश्यक आहे. मराठीत बोलणं ही आपली जबाबदारी असून ती भाषा शिकली पाहिजे असा सूर सुनील शेट्टीचा होता. 

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या ठिकाणी पोटापाण्यासाठी देशभरातून अनेकजण येतात. मुंबईत काही वर्षांपासून राहणारे लोक आहेत, तर अनेकांच्या काही पिढ्याही या शहरात गेल्या आहेत. असं असतानाही बाहेरुन मुंबईत कामानिमित्त आलेले लोक हे मराठी भाषा बोलत नाहीत. इथली संस्कृती न अवलंबता आपलीच संस्कृती रेटतात. त्यामुळे कधीकधी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद होतो. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुनील शेट्टी याने एक वक्तव्य केलं आहे. मुंबईत राहायचं तर मराठी आली पाहिजे असं तो म्हणाला. सुनील शेट्टीचे मराठीसंबंधित वक्तव्य हे अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरेल. 

अभिनेता सुनील शेट्टीने मुंबईत राहणाऱ्या सर्वांसाठी एक भावनिक आवाहन करत मराठी भाषेबाबत आपली जाणीवपूर्वक भूमिका स्पष्ट केली. मुंबई ही आपली कर्मभूमी आहे आणि इथली मराठी भाषा शिकणे, ती बोलणे हे आपलं कर्तव्य असल्याचं तो म्हणाला. मराठीत बोलता न येणं याबद्दल आपल्याला वाईट वाटलं पाहिजे असंही तो म्हणाला. 

Suniel Shetty On Marathi Language : काय म्हणाला सुनील शेट्टी? 

मी मुंबईत राहतो. माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी नाही आली तरी चालेल. पण मी जर मराठी बोललो तर तुम्हाला बरे वाटेल, सर्वांनाच बरे वाटेल. जर कर्मभूमीत राहून मी मराठी बोललो नाही तर त्याचा दुसऱ्यांना नाही तर स्वतःला त्रास झाला पाहिजे. मराठी येत नाही याबद्दल स्वतःला वाईट वाटलं पाहिजे. इथे राहून मराठी शिकायचं आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. जसं इतर लोक मराठी बोलतात तसं मराठी आपल्यालाही बोलता आलं पाहिजे.

Suniel Shetty Video On Marathi : मराठीत बोला, सुनील शेट्टीचा संदेश

मुंबईत राहताना इथल्या मातृभाषेचाही आदर करणं आवश्यक आहे. मराठीत बोलणं ही आपली जबाबदारी असून ती भाषा शिकली पाहिजे असा सूर सुनील शेट्टीचा होता. 

सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानं सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी त्याचे कौतुक केलं आहे. मुंबईत अनेक दशकांपासून राहणारे परप्रांतीय नागरिक मराठी शिकत नाहीत, हे वास्तव अधोरेखित करत सुनील शेट्टीने त्यांना मराठी शिकणाच्या अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.

Marathi Vs Hindi In Mumbai : भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं पाऊल

मुंबईत अनेक वेळा 'मराठी विरुद्ध हिंदी' असा वाद चिघळताना दिसतो. कामानिमित्ताने बाहेरच्या राज्यातून आलेल्यांनी स्थानिक संस्कृतीचा, भाषेचा सन्मान न केल्यामुळे तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत, एखाद्या लोकप्रिय कलाकाराने अशा प्रकारची संवेदनशील भूमिका घेणं महत्त्वाचं ठरतं. सुनील शेट्टीने फक्त भाषेचा आग्रह न धरता, 'मराठी येत नाही याचं स्वतःला वाईट वाटलं पाहिजे' असं म्हणत आत्मपरिक्षणाचा संदेश दिला. 

भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून, ती संस्कृतीची ओळख असते. मुंबईसारख्या शहरात मराठी भाषेबद्दल समज आणि आदर वाढवण्यासाठी सुनील शेट्टीसारख्या कलाकारांचे पुढे येणं काळाची गरज आहे.

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | ABP Majha
Shiv Sena Symbol Case: धनुष्यबाण कोणाचा? Supreme Court मध्ये 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी, Thackeray गटाचं भवितव्य ठरणार?
Pune Land Deal: 'मी कामाचा माणूस, चुकीचं खपत नाही', Deputy CM Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण
Jarange Murder Plot: 'Dada Garud शी संबंध नाही, दलितांचा बळी देऊ नका', Kanchan Salve आक्रमक
Bihar Polls 2025 : Chiraiya चे BJP उमेदवार Lalbabu Prasad Gupta पैसे वाटताना कॅमेऱ्यात कैद? FIR दाखल.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Jaya Bachchan On Dharmendra: 'माझं धर्मेंद्रवर प्रेम आहे...', जेव्हा हेमा मालिनी यांच्यासमोरच जया बच्चन यांनी दिलेली प्रेमाची कबुली; काय घडलेलं?
'माझं धर्मेंद्रवर प्रेम आहे...', जेव्हा हेमा मालिनी यांच्यासमोरच जया बच्चन यांनी दिलेली प्रेमाची कबुली
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Embed widget