एक्स्प्लोर

Suniel Shetty VIDEO : मुंबईत राहताय तर मराठीत बोललं पाहिजे, सुनील शेट्टीचा भावनिक संदेश, बाहेरुन आलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन

Suniel Shetty On Marathi : मुंबईत राहताना इथल्या मातृभाषेचाही आदर करणं आवश्यक आहे. मराठीत बोलणं ही आपली जबाबदारी असून ती भाषा शिकली पाहिजे असा सूर सुनील शेट्टीचा होता. 

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या ठिकाणी पोटापाण्यासाठी देशभरातून अनेकजण येतात. मुंबईत काही वर्षांपासून राहणारे लोक आहेत, तर अनेकांच्या काही पिढ्याही या शहरात गेल्या आहेत. असं असतानाही बाहेरुन मुंबईत कामानिमित्त आलेले लोक हे मराठी भाषा बोलत नाहीत. इथली संस्कृती न अवलंबता आपलीच संस्कृती रेटतात. त्यामुळे कधीकधी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद होतो. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुनील शेट्टी याने एक वक्तव्य केलं आहे. मुंबईत राहायचं तर मराठी आली पाहिजे असं तो म्हणाला. सुनील शेट्टीचे मराठीसंबंधित वक्तव्य हे अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरेल. 

अभिनेता सुनील शेट्टीने मुंबईत राहणाऱ्या सर्वांसाठी एक भावनिक आवाहन करत मराठी भाषेबाबत आपली जाणीवपूर्वक भूमिका स्पष्ट केली. मुंबई ही आपली कर्मभूमी आहे आणि इथली मराठी भाषा शिकणे, ती बोलणे हे आपलं कर्तव्य असल्याचं तो म्हणाला. मराठीत बोलता न येणं याबद्दल आपल्याला वाईट वाटलं पाहिजे असंही तो म्हणाला. 

Suniel Shetty On Marathi Language : काय म्हणाला सुनील शेट्टी? 

मी मुंबईत राहतो. माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी नाही आली तरी चालेल. पण मी जर मराठी बोललो तर तुम्हाला बरे वाटेल, सर्वांनाच बरे वाटेल. जर कर्मभूमीत राहून मी मराठी बोललो नाही तर त्याचा दुसऱ्यांना नाही तर स्वतःला त्रास झाला पाहिजे. मराठी येत नाही याबद्दल स्वतःला वाईट वाटलं पाहिजे. इथे राहून मराठी शिकायचं आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. जसं इतर लोक मराठी बोलतात तसं मराठी आपल्यालाही बोलता आलं पाहिजे.

Suniel Shetty Video On Marathi : मराठीत बोला, सुनील शेट्टीचा संदेश

मुंबईत राहताना इथल्या मातृभाषेचाही आदर करणं आवश्यक आहे. मराठीत बोलणं ही आपली जबाबदारी असून ती भाषा शिकली पाहिजे असा सूर सुनील शेट्टीचा होता. 

सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानं सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी त्याचे कौतुक केलं आहे. मुंबईत अनेक दशकांपासून राहणारे परप्रांतीय नागरिक मराठी शिकत नाहीत, हे वास्तव अधोरेखित करत सुनील शेट्टीने त्यांना मराठी शिकणाच्या अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.

Marathi Vs Hindi In Mumbai : भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं पाऊल

मुंबईत अनेक वेळा 'मराठी विरुद्ध हिंदी' असा वाद चिघळताना दिसतो. कामानिमित्ताने बाहेरच्या राज्यातून आलेल्यांनी स्थानिक संस्कृतीचा, भाषेचा सन्मान न केल्यामुळे तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत, एखाद्या लोकप्रिय कलाकाराने अशा प्रकारची संवेदनशील भूमिका घेणं महत्त्वाचं ठरतं. सुनील शेट्टीने फक्त भाषेचा आग्रह न धरता, 'मराठी येत नाही याचं स्वतःला वाईट वाटलं पाहिजे' असं म्हणत आत्मपरिक्षणाचा संदेश दिला. 

भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून, ती संस्कृतीची ओळख असते. मुंबईसारख्या शहरात मराठी भाषेबद्दल समज आणि आदर वाढवण्यासाठी सुनील शेट्टीसारख्या कलाकारांचे पुढे येणं काळाची गरज आहे.

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget