एक्स्प्लोर

ST bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांसमोर समस्या, कोकणात जाण्यासाठी रिझर्व्हेशन केलेल्या बसेसचं काय होणार?

ST bus strike: गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. मुंबई सेंट्रल एसटी आगारात अनेक प्रवाशी ताटकळत उभे आहेत. राज्यातील 251 आगारांपैकी 59 आगारे पूर्णपणे बंद

मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यभरात प्रवाशांची कोंडी होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवासाठी कोकणातील आपापल्या गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांना बसण्याची शक्यता आहे. कोकणातील दापोली, खेड या एसटी आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी एसटी संपाला उत्स्फुर्त पाठिंबा दिला होता. याचा परिणाम कोकणातील एसटी सेवेवर दिसून येत आहे. मुंबई सेंट्रल आगारातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर याचा प्रभाव जाणवत आहे. रात्री बाहेरील डेपोतून गाड्या मुंबई सेन्ट्रलमध्ये येणं अपेक्षित होते. मात्र, या एसटी बसेस आगारात न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोकणात नियोजित असलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागू शकतात. तसे झाल्यास गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आपल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे.

जिच्या भरवशावर गणेशोत्सवासाठी गावाला जायचं नियोजन केलं होतं त्याच एसटीनं दगा दिल्याने गाव गाठायचे कसे, असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. मुंबई सेन्ट्रलमध्ये कोकणात जाणाऱ्या आणि आरक्षण केलेल्या  प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला वेढा घातला आहे. काही अंशी गाड्या सुरु आहेत त्या गर्दी होत असलेल्या मार्गावरच सोडल्या जात आहेत. दुसरीकडे, प्रवाशांकडून कोकणात जाणाऱ्या गाड्या संदर्भात विचारणा केली जातेय. मात्र, चालक-वाहक उपलब्ध नसल्यानं गाड्या सुटत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे देवाक काळजी रं म्हणणाऱ्या प्रवाशांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. 

एसटी महामंडळाच्या गणपती विशेष गाड्यांमध्ये ४२०० गट आरक्षण आणि ७०० पेक्षा अधिक वैयक्तिक आरक्षणाचा सहभाग आहे.  सर्वाधिक गाड्या ४,५ आणि ६ सप्टेंबर रोजी सुटणार असल्याने आंदोलन सुरु राहिल्यास प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज अनेक प्रवाशांची तिकीटे आरक्षित आहेत. मात्र, सध्या मुंबई सेंट्रल एसटी आगारात बसेस नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवासी तासभरापेक्षा अधिक काळ डेपोत थांबून आहेत. 

जादा गाड्यांची संख्या किती?

आज  
मुंबई - 337
ठाणे - 472
पालघर - 187

उद्या 
मुंबई - 1365
ठाणे - 1881
पालघर - 372 

शुक्रवार
मुंबई - 110
ठाणे - 96
पालघर - 70

सोलापूरमध्ये एसटी संपाचा परिणाम

एसटी कर्मचारी संपामुळे सोलापूर विभागातून होणाऱ्या वाहतुकीवर आज काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातून मुक्कामी येणाऱ्या बहुतांश एसटी बसेस सोलापुरात मुक्कामी आल्या नाहीत. तर गणेशोत्सवसाठी सोलापूर विभागातील जवळपास 235 बसेस कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल दिवसभरात एसटी संपाचा कोणताही परिणाम न जाणवलेल्या सोलापूर विभागात बुधवारी काहीसा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. मात्र,  सकाळपासून सोलापूर आगारतून सुटणाऱ्या गाड्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावत आहेत. 

नागपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संमिश्र परिणाम 

नागपूरमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी व्हायला नकार दिल्याने अनेक फेऱ्या नियमित सुरु  आहेत.  संपकाऱ्यांनी नागपूर-इंदोर गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर ती गाडी सोडण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांची जनसंघ संघटना संपापासून दूर झाल्याने 30 टक्के कर्मचारी संपापासून दूर आहेत. 

बुलढाण्यातली एसटी सेवेवर संपाचा किती परिणाम

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम आता बुलढाणा जिल्ह्यात काही प्रमाणात जाणवायला लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगारातील कर्मचारी निम्याहून अधिक कर्मचारी संपावर असल्याने आज सकाळपासून राज्य परिवहन मंडळाची काही बसेस रस्त्यावर धावत आहेत तर अनेक बसेस रद्द झाल्या आहेत. त्यामुळे नोकरदार असू देत ,शालेय विद्यार्थी, वृद्ध प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र सध्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने व आगामी काळात गणेश उत्सव , गौरी गणपती असे उत्सव असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सातही आजारातून थोड्या प्रमाणात का होईना बस सेवा सुरू आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून आज पासून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आगार बंद आंदोलन बुलढाणा जिल्ह्यात करणार आहेत. त्यामुळे दुपारनंतर कदाचित बुलढाणा जिल्ह्यातील बस सेवा आगार बंद पडल्याने ठप्प होण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये एसटी सेवेची स्थिती काय?

एकीकडे एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांनी मागण्यासाठी संप पुकारला आहे. जिल्ह्यामध्ये नऊ आगार असून या संपाचा परिणाम दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी 50 बसेस लातूर जिल्ह्यात  पाठविण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत आहे. संपाचा हा दुसरा दिवस असून काल 9 आगारांमधून दहा ते बाराच बस सेवा तुरळक सुरू होत्या तर आज सकाळपासून या संपाचा परिणाम दिसून येत आहे.

आणखी वाचा

एसटी कर्मचारी संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्ते तुटून पडले

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget