एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
'सिद्धिविनायक' कडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत, 51 लाखांची मदत जाहीर
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांसाठी श्री सिद्धिविनायक मंदीर न्यासाकडून 51 लाखांची मदत जाहीर केली आहे. याबाबत श्री सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माहिती दिली आहे.
!['सिद्धिविनायक' कडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत, 51 लाखांची मदत जाहीर Siddhivinayak trust announced help of 51 lakh to soldiers killed in pulwama attack 'सिद्धिविनायक' कडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत, 51 लाखांची मदत जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/25073714/Siddhivinayak.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य सरकारच्या मदतीआधी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून शहिद जवानांना मदत जाहीर केली आहे. काल झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारकडून शहीद जवानांच्या मदतीसाठी अद्याप कुठलीही मदत जाहीर केलेली नाही.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांसाठी श्री सिद्धिविनायक मंदीर न्यासाकडून 51 लाखांची मदत जाहीर केली आहे. याबाबत श्री सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माहिती दिली आहे. तसेच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना पुण्यातली क्वीन मँरी टेक्निकल इन्स्टिटयूटच्या माध्यमातून 25 लाखांची करणार मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
श्री सिद्धिविनायक मंदीर न्यास विश्वस्त मंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे मंजूरीसाठी पाठवला आहे.
शांत राहणे मर्दानगी नाही, पाकिस्तानात घुसून मारा, उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
पुलवामा हल्ल्याबाबत माझी प्रतिक्रिया वेगळी नाहीये. लोकांच्या भावना आहेत त्याच माझ्याही भावना आहेत. आता पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आहे. आता शांत राहणे मर्दानगी नाही, पाकिस्तानमध्ये घुसून आता मारले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
पुलवामामधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारकडे पाकिस्तानसंदर्भात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली.
पाकिस्तानचे काहीतरी केले पाहिजे. एकदाच पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका, असे त्यांनी म्हटले आहे. हा हल्ला म्हणजे इंटेलिजेंसचे अपयश आहे. जसे दहशतवादी आपल्या भूमीत येऊन हल्ले करत आहेत तसेच आपण देखील त्यांच्या भूमीत जाऊन हल्ला करणे गरजेचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
काय झालं पुलवामात?
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
संबधित बातम्या
पाकिस्तानविरुद्ध पहिली कारवाई, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला
पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय?
Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य
Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 40 जवान शहीद
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion