एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला केंद्राकडून हिरवा कंदिल; ठाणेकरांना मोठं गिफ्ट

ठाणे खाडीला 'रामसर' दर्जा, पर्यटन वाढीस मिळणार चालना, रोजगार निर्मितीही होणार

Thane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठवलेल्या एका प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजूरी दिली आहे.  ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. 

ठाणे खाडी क्षेत्रात फ्लेमिंगो अभयारण्य 16.905 चौरस किलोमीटर क्षेत्रावर आहे. रामसर दर्जामुळे पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होणार आहे. यामुळं पर्यावरण आणि पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

रामसर स्थळाचा दर्जा मिळालेले मुंबईतील पहिलेच क्षेत्र 

नांदूर मध्यमेश्वर, लोणारनंतर ठाणे खाडी क्षेत्र महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळाचा दर्जा मिळालेले क्षेत्र, तर मुंबईतील पहिलेच क्षेत्र आहे.  देशात आणखी 11 पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश, तामिळनाडू, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पाणथळ प्रदेशांचा समावेश आहे. तांपारा तलाव, हिराकुड जलाशय, अनसुपा तलाव, यशवंत सागर, चित्रागुडी पक्षी अभयारण्य, सुचिंद्रम थेरुर पाणथळ क्षेत्र, वाडुवूर पक्षी अभयारण्य, कांजिरंकुलम पक्षी अभयारण्य, ठाणे खाडी क्षेत्र,  हायगम पाणथळ संवर्धन क्षेत्र, शालबुग पाणथळ हे संवर्धन क्षेत्र आहेत.  भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 75 वर गेली आहे. 

ठाणे ही आशियातील सर्वात मोठी खाडी असून एकूण 6522.5 हेक्टर क्षेत्र यात येते, त्यापैकी 1690.5 हेक्टर ठाणे फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित आहे, तर 4832 हेक्टर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित आहे, यात भारतातील 20 टक्के कांदळवनाच्या प्रजाती आहेत, ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो सोबत असंख्य स्थलांतरित पक्षांच्या जाती इथे येतात, कांदळवनात आढळणारे विविध मासे, कीटक, फुलपाखरे इथे आढळतात. जर रामसर दर्जा मिळाल्याने संपूर्ण ठाणे कांदळवन त्यात येईल, या संपूर्ण प्रदेशाचे संरक्षण होईल, इथल्या पर्यावरणाचे संरक्षण होईल, या कांदळवनात आंतरराष्ट्रीय नियम लागू होतील.  

'रामसर' म्हणजे काय? 
तर, 1971 साली इराणमधील 'रामसर' शहरात 'रामसर परिषद' पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. यासाठी पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा करण्यात आला. भारताने 'रामसर' करारावर 1982 साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील 2410 पाणथळींना 'रामसर' चा दर्जा प्राप्त आहे, तर गेल्या 35 वर्षांमध्ये भारतातील 27 पाणथळींना 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळाला आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, लातूरचा निकाल सर्वात कमी, पाहा तुमच्या विभागाची टक्केवारी
बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, लातूरचा निकाल सर्वात कमी, पाहा तुमच्या विभागाची टक्केवारी
Sanjay Gandhi National Park Mumbai : संजय गांधी उद्यानाचं शुल्क 383 रुपयांवरुन थेट 10 हजारांवर, संतापाची लाट उठताच वन विभागाचं एक पाऊल मागे!
संजय गांधी उद्यानाचं शुल्क 383 रुपयांवरुन थेट 10 हजारांवर, संतापाची लाट उठताच वन विभागाचं एक पाऊल मागे!
Mumbai Family Death WaterMelon: मुंबईतील कुटुंबाचा मृत्यू, 'त्या' अर्धवट उरलेल्या कलिंगडाबाबत एफडीएची महत्त्वाची माहिती समोर, विषारी होतं की नव्हतं?
मुंबईतील कुटुंबाचा मृत्यू, 'त्या' अर्धवट उरलेल्या कलिंगडाबाबत एफडीएची महत्त्वाची माहिती समोर, विषारी होतं की नव्हतं?

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jabalpur Cruise Accident Viral Photo Fact Check: जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Mumbai-Pune Expressway Missing Link : गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल, कोणत्या नंबरवर पाठवाल?
बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल? जाणून घ्या एकाच क्लिकवर...
Pune Bhor Crime news: भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
भोरमध्ये चिमुरडीसोबत अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
Embed widget