एक्स्प्लोर

मुंबईतील हजारोंचा मोर्चा शांततेत पार पडण्यामागचे रहस्य

नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. त्यामुळे अनेकजण जखमी झालेत. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईत निघालेल्या मोर्चामुळे एकही अनुचित प्रकार घडला नाही.

मुंबई : आज नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात तब्बल 10 हजार आंदोलक सहभागी झाले होते. यासाठी 2 हजार पोलीसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. दिवसभर हे आंदोलन अगदी शांततेत पार पडलं. हे आंदोलन पोलिस आणि आयोजक यांच्यातील सौहार्दपुर्ण संवादामुळे विशेष लक्षणीय ठरलं. याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा.. मुंबईतील हजारो आंदोलकांचा शिस्तपूर्ण मोर्चा पाहिल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, की हे कसं शक्य झालं? संपूर्ण आंदोलनात कोणतीही अनुचित घटना नाही, की कोठेही वादविवाद नाही, हे नेमकं कशामुळ घडलं? मुळात हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात आयोजीत करण्याचा मानस आयोजकांचा होता. परंतु, या परिसरात असणाऱ्या सरकारी कार्यालयामुळे पोलीस प्रशासनाने हा मोर्चा ऑगस्ट क्रांती मैदानात घेण्याची विनंती आयोजकांना केली. त्यांनी देखील ती तत्काळ मान्य केली. आयोजकांनी पोलीसांची विनंती मान्य केल्यानंतर आता खरं आव्हान पोलीस प्रशासनासमोर होतं. देशभरात अनेक ठिकाणी होतं असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे मुंबईतील मोर्चा शांतते कसा पार पाडायचा यासाठी पोलिसांनी एक विशेष प्लान तयार केला.
  • आंदोलनासाठी पोलीसांची 2 हजार जवानांची फौज तयार करण्यात आली. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांची सीसीटीव्हीची गाडी मोर्चावर सतत लक्ष ठेऊन होती. आंदोलनाच्या मार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांचे आवाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आंदोलनस्थळापासून जाणाऱ्या रस्त्यांचे मार्ग बदलण्यात आले. आंदोलनात समाजकंटक घुसण्याची शक्यता असल्यामुळे साध्या वेशातील पोलिसांनी त्यांची आधीच धरपकड केली होती. प्रत्येक संघटनेच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं होतं.
या प्लानसोबतच पोलीसांनी आंदोलकांकडुन कोणतीही हिंसक घटना घडणार नाही. हे लिखित स्वरुपात देखील घेतलं होतं. त्यामुळेच देशभरात या आंदोलनाला अनेक ठिकाणी गालबोट लागत असताना मुंबईत मात्र हे आंदोलन दुपारी 4 वाजता सुरु होऊन राष्ट्रगीत झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता संपुष्टात आलं. संबंधित बातम्या: CAA आणि NRC बद्दल तुमच्याही मनात आहेत 'हे' प्रश्न, जाणून घ्या नेमकी उत्तरं CAA Protest | देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नागरिक रस्त्यावर; अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण CAA Protest | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुस्लीमांचा मोर्चा, मालेगाव बंदची हाक | ABP Majha

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget