एक्स्प्लोर

CAA आणि NRC बद्दल तुमच्याही मनात आहेत 'हे' प्रश्न, जाणून घ्या नेमकी उत्तरं

CAA आणि NRC मुळे सध्या देशभरात रान पेटलं आहे. अनेक शहरांमध्ये याच्याविरोधात आंदोलन सुरु आहेत. मात्र CAA नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC बद्दल अनेकांच्या मनात काही प्रश्न आहेत. हे समजून घेण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित आणि अनेकांना पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सध्या देशातल्या अनेक भागांत निषेधाची लाट उसळली आहे. सुरुवातीचे दोन दिवस आसाम या हिंसाचाराचं केंद्र होतं. पण ईशान्य भारताकडे आपली जी नेहमीची दुय्यम वागणूक असते, त्याला अनुसरुन तिथल्या नागरिकांचा रोष काही आपल्यापर्यंत पोहचलाच नाही. दिल्लीतल्या जामिया मिलियामध्ये झालेल्या आंदोलनात काही समाजकंटकांनी हिंसा घडवून आणली, त्याचं खापर विद्यार्थ्यांवर फुटलं. त्यांना बडवायला दिल्लीचे पोलीस अगदी विद्यापीठाच्या लायब्ररीत घुसले आणि या सगळ्यानंतर या प्रकरणाची जास्त चर्चा सुरु झाली. निषेधाचं लोण आता महाराष्ट्राच्याही अनेक शहरांमध्ये उमटतंय. पण नेमका विरोध कशाला होत आहे? हे समजून घेण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित आणि अनेकांना पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. प्रश्न :- CAA मध्येच NRC समाविष्ट आहे का ? उत्तर- असं काही नाही. CAA हा वेगळा कायदा आहे तर NRC ही एक वेगळी प्रक्रिया आहे. CAA संसदेमध्ये पारित झाल्यानंतर देशभरात लागू झाला आहे. तर NRC चे नियम आणि प्रक्रिया अजून निश्चित व्हायच्या आहेत. आसाममध्ये जी NRC ची प्रक्रिया सुरु आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि आसाम समझौत्याच्या अंतर्गत केली आहे. प्रश्न – नागरिकता सुधारणा कायदा कुणावर लागू होतो? उत्तर- हा कायदा पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तानमधून  31 डिसेंबर 2014 पर्यंत धार्मिक कारणाने होत असलेल्या छळाला कंटाळून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ईसाई आणि पारसी समाजाच्या निर्वासितांना नागरिकता देण्यासाठी आहे. प्रश्न :- एनआरसी आणि सीएएपासून भारतीय मुसलमानांनी घाबरण्याचं काही कारण आहे का? उत्तर- कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकांनी एनआरसी आणि सीएएमुळे घाबरू नये. प्रश्न :- एनआरसी फक्त मुस्लिमांसाठीच आहे का? उत्तर- नाही, एनआरसी आणि धर्माचा काहीही संबंध नाही. प्रश्न :- एनआरसीमध्ये धार्मिक मुद्द्याच्या आधारे लोकांना बाहेर पाठवणार का? उत्तर - नाही, एनआरसी कोणत्याही धर्मावर आधारित नाही. प्रश्न :- एनआरसीद्वारे भारतीय मुस्लिमांना नागरिकत्वाचे पुरावे द्यावे लागणार? उत्तर - एनआरसी जेव्हा कायदा बनेल त्यावेळी कोणताही पुरावा चालेल. प्रश्न :- नागरिकत्व कसं दिलं जाणार? सरकारच्याच मनावर नागरिकत्व मिळणार का? उत्तर - जन्म, वंश, नोंदणीकरण प्रश्न :- जर एनआरसी लागू झाली तर मला 1971 च्या आधीची वंशावळी सिद्ध करावी लागले का? उत्तर : नाही, तुम्हाला 1971 च्या अगोदरची वंशावळी सिद्ध करण्यासाठी आई-वडिलांचे जन्म प्रमाण पत्र आणण्याची आवशक्यता नाही. ते फक्त आसाम एनआसीसाठी लागू होते. आसाम करार आणि मानणीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ते झालं होतं. देशाच्या अन्य भागात सीटीझनशीप नियम 2003 च्या नुसार एनआरसीची प्रक्रीया राबवली जाणार आहे. हे ही वाचा- BLOG | नागरिकत्व कायद्याला विरोध यासाठी होतोय... प्रश्न :- ओळख सिद्ध करणं इतकं सोपं आहे, तर आसाममधून 19 लाख लोक एनआरसीमधून बाहेर कसे राहिले? उत्तर :- आसामच्या समस्यांची देशाशी तुलना करणे योग्य नाही. तिथं घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. याविरोधात तिथं सहा वर्ष आंदोलन झालंय. या घुसखोरांमुळे राजीव गांधी यांना 1985 मध्ये एक करार करावा लागला होता. त्यानुसार घुसखोरांची ओळख सिद्ध करण्यासाठी 25 मार्च 1971 सालची मर्यादा एनआरसीला ठेवण्यात आली. प्रश्न :- एनआरसीसाठी किचकट आणि जुने दस्तावेज मागितले जातील का? जे मिळवणं अवघड आहे.? उत्तर :-  ओळख सिद्ध करण्यासाठी सामान्य दस्तावेज चालतील. राष्ट्रीय स्तरावर एनआरसीची घोषणा झाली. तर सरकार त्यासाठी नियमावील जारी करेल, ज्यामुळे अडचणी येणार नाहीत. सरकार आपल्या नागरिकांना त्रास देण्याचा विचार करणार नाही. प्रश्न :- एखादा अशिक्षित व्यक्ती असेल आणि त्याच्याकडे दस्तावेज नसतील तर काय होईल? उत्तर : अशा प्रकरणात अधिकारी त्याला साक्षिदार आणण्याची परवानगी देतील. सोबतच अन्य पुरावे आणि कम्युनिटी वेरिफीकेशनसाठी देखील परवानगी देतील. यासाठी सुटसुटीत पद्धत अवलंबवली जाईल. कोणत्याही नागरिकाला त्रास होईल, असे केले जाणार नाही. प्रश्न :- गरीब, अशिक्षित, ओळख नसलेल्या लोकांचं काय? उत्तर - कोणत्याही नागरिकाचा सरकारी यंत्रणेशी संबंध येतोच. त्याच्या आधारेच अशा व्यक्तीची ओळख पटवली जाईल. प्रश्न :- एनआरसीद्वारे अन्य लिंगी, नास्तिक, आदिवासी, दलित, महिला आणि भूमिहीन लोक वगळले जातील का? उत्तर- अशा कोणत्याही समुदायाला एनआरसीतून वगळले जाणार नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidarbha Heat Wave: सूर्य कोपणार! पुढचे चार दिवस विदर्भात उष्णलहरींचा उद्रेक; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
सूर्य कोपणार! पुढचे चार दिवस विदर्भात उष्णलहरींचा उद्रेक; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
CJI Suryakant: प.बंगालमध्ये 92 टक्के मतदान, सर्वोच्च न्यायालयाकडून आनंद; म्हणाले, तेव्हा लोकशाही बळकट होते
प.बंगालमध्ये 92 टक्के मतदान, सर्वोच्च न्यायालयाकडून आनंद; म्हणाले, तेव्हा लोकशाही बळकट होते
Shahu Maharaj and Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार....
आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार....
Donald Trump: 'मिस्टर ट्रम्प, एकदा भारतात येऊन तर बघा...'; भारताला 'नरक' म्हणणाऱ्या ट्रम्प यांना इराणचं चोख प्रत्युत्तर, व्हिडिओ व्हायरल!
'मिस्टर ट्रम्प, एकदा भारतात येऊन तर बघा...'; भारताला 'नरक' म्हणणाऱ्या ट्रम्प यांना इराणचं चोख प्रत्युत्तर, व्हिडिओ व्हायरल!

व्हिडीओ

MI vs CSK : 103 धावांनी 'चेन्नई एक्सप्रेस' समोर मुंबई इंडियन्सचा पराभव
Baramati Special Report : बारामतीचा सुभेदार, पवारांमध्येच वॉर? जय पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sanjay Gaikwad Special Report : पुस्तकाबद्दल अज्ञान, गुंडगिरी बेभान,संजय गायकवाडांची जीभ घसरली
Jay Pawar on 2029 Vidhansabha Election: तुम्ही 2029 च्या निवडणुकीत युगेंद्र पवारांविरोधात लढणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले...
Rohit Pawar and Jay Pawar : बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Nashik Court Hearing: अशोक खरातचे वकील कोर्टात संतापले, म्हणाले, एसआयटी सारखं तेच पाणी आणि पेढे करत बसलेय, न्यायाधीशांचा महत्त्वाचा निर्णय
अशोक खरातचे वकील कोर्टात संतापले, म्हणाले, एसआयटी सारखं तेच पाणी आणि पेढे करत बसलेय, न्यायाधीशांचा महत्त्वाचा निर्णय
CJI Suryakant: प.बंगालमध्ये 92 टक्के मतदान, सर्वोच्च न्यायालयाकडून आनंद; म्हणाले, तेव्हा लोकशाही बळकट होते
प.बंगालमध्ये 92 टक्के मतदान, सर्वोच्च न्यायालयाकडून आनंद; म्हणाले, तेव्हा लोकशाही बळकट होते
Shahu Maharaj and Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार....
आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार....
Sanju Samson: मुंबईला घरात घुसून लोळवणाऱ्या संजू सॅमसनसाठी काय पण! चक्क शशी थरुरांनी रचली कविता
मुंबईला घरात घुसून लोळवणाऱ्या संजू सॅमसनसाठी काय पण! चक्क शशी थरुरांनी रचली कविता
Manipur Crisis: देशात सत्ताधाऱ्यांचेच महिला आरक्षणावर मोर्चे सुरु असताना तीन वर्षापासून जळत असलेल्या मणिपुरात महिलांचा आक्रोश; दिवसा रास्ता रोको, रात्री कायदा व सुव्यवस्थेसाठी 'मशाल' हाती
देशात सत्ताधाऱ्यांचेच महिला आरक्षणावर मोर्चे सुरु असताना तीन वर्षापासून जळत असलेल्या मणिपुरात महिलांचा आक्रोश; दिवसा रास्ता रोको, रात्री कायदा व सुव्यवस्थेसाठी 'मशाल' हाती
ट्रम्प म्हणाले, 'पोरं इथं जन्माला घालून नागरिकत्व मिळताच भारतासारख्या नरकातून इथं अख्खं कुटूंब घेऊन येतात आणि...' आता भारतानं काय म्हटलं? त्याच भाषेत उत्तर दिलं की नाही?
ट्रम्प म्हणाले, 'पोरं इथं जन्माला घालून नागरिकत्व मिळताच भारतासारख्या नरकातून इथं अख्खं कुटूंब घेऊन येतात आणि...' आता भारतानं काय म्हटलं? त्याच भाषेत उत्तर दिलं की नाही?
Girish Mahajan and Zen Sadavarte: गिरीश महाजनांना खडेबोल सुनावणाऱ्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंच्या मुलीची पोलिसांत तक्रार, नक्की काय घडलं?
गिरीश महाजनांना खडेबोल सुनावणाऱ्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंच्या मुलीची पोलिसांत तक्रार, नक्की काय घडलं?
Iran War Live Update: ट्रम्पनी लेबनॉन आणि इस्रायलमध्ये तीन आठवड्यांसाठी युद्धविराम वाढवला, पण इराणवरून भूवया उंचावल्या; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
ट्रम्पनी लेबनॉन आणि इस्रायलमध्ये तीन आठवड्यांसाठी युद्धविराम वाढवला, पण इराणवरून भूवया उंचावल्या; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Embed widget