एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पालघरमध्ये प्रवाशांचा संताप, 20 मिनिटे रेलरोको
प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत सोडण्याचे रेल्वेने मान्य केलं. अखेर 20 मिनिटांनी रेलरोको मागे घेण्यात आला.
![पालघरमध्ये प्रवाशांचा संताप, 20 मिनिटे रेलरोको rail roko at palghar पालघरमध्ये प्रवाशांचा संताप, 20 मिनिटे रेलरोको](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/12075735/Palghar-Rail-roko.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर: जोरदार पावसाने विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पालघर-डहाणू परिसरात जोरदार पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस वाहतूक विस्कळीत झाली होती.
डहाणूत आज प्रवाशांनी रेलरोको केला. अरावली एक्स्प्रेस डहाणूपर्यंतच सोडल्याने हा रेल रोको करण्यात आला. प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत सोडण्याचे रेल्वेने मान्य केलं. अखेर 20 मिनिटांनी रेलरोको मागे घेण्यात आला.
अरावली एक्स्प्रेस वांद्र्यापर्यंत जाते. मात्र पुढे पाणी भरल्याचे कारण देत डहाणू इथूनच गाडी पुन्हा परतायला लावल्यावर प्रवासी संतापले होते. त्यामुळेच प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली.
चर्चगेट-डहाणू रोडदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. डहाणू ते चर्चगेट वाहतूक वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे.
वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाने विश्रांती दिली आहे. चर्चगेट-डहाणू रोडदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. तब्बल 48 तासानंतर डहाणू-चर्चगेट वाहतूक सुरळीत झाली आहे. मेल एक्स्प्रेस नियोजित वेळेनुसार धावणार आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)