एक्स्प्लोर

आठवलेंवरील हल्ल्यानंतर वातावरण तापलं, कार्यकर्त्यांकडून अंबरनाथ बंद

आरपीआय (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ बंद पुकारला असून शहरात सर्व दुकाने बंद आहेत. शहरात आरपीआय कार्यकर्त्यांनी लावले निषेधाचे फलक लावले आहेत.

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अंबरनाथमध्ये वातावरण तापले आहे. आरपीआय (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ बंद पुकारला असून शहरात सर्व दुकाने बंद आहेत. शहरात आरपीआय कार्यकर्त्यांनी लावले निषेधाचे फलक लावले आहेत. दरम्यान, आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याला काल रात्री उशिरा मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी गंभीर आहे.
या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून आरपीआय कार्यकर्ते सकाळपासून चौकाचौकात जमत बंदचं आवाहन करत आहेत. असे असले तरी रिक्षा युनियनने बंदमध्ये सहभागी होण्यास विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काल आठवलेंवर झालेला हल्ला हा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरपीआयचा आरोप असून जोपर्यंत स्थानिक एसीपी आणि डीसीपी यांना निलंबित केलं जात नाही, तोवर बंद सुरू राहील, असा इशारा आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष अजय जाधव यांनी दिला आहे.
ठाण्यातही कार्यकर्त्यांचा रास्तारोको 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील आनंदनगर जकात नाका येथे आठवले समर्थकांनी  घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ठाणे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याची पार्श्वभूमी -  प्रवीण गोसावी हा मूळचा अमरावती जिल्ह्यातला असून सध्या अंबरनाथच्या लक्ष्मीनगर भागात राहतो -  सुरुवातीला रिक्षाचालक होता, मनसे वाहतूक सेनेचा पदाधिकारी होता, आता बांधकाम व्यावसायिक आहे -  अंबरनाथ शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख
-  एकदा नगरपालिकेविरोधात उपोषण केलं , तर एकदा पालिकेच्या लिपिकाला एसीबीमार्फत पकडून दिलं आहे -  मनसेची भूमिका पटेनाशी झाल्यानं मनसेतून बाहेर पडला, त्यावेळीही राज ठाकरेंविरोधात फेसबुकवर लिखाण केलं -  यानंतर काही काळ आरपीआय आठवले गटात सक्रिय, मात्र त्यातूनही बाहेर पडला आणि आठवलेंविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत -  सध्या भारिप बहुजन महासंघात सक्रिय असून रामदास आठवलेंचा तिरस्कार अनेकदा त्याच्या बोलण्यातून आणि पोस्टमधून दिसून आलाय -  रामदास आठवले यांना समाजाशी देणं घेणं नसून फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करत असल्याचा गोसावी याचा आरोप आहे - याच रागातून त्याने काल आठवले यांच्यावर हल्ला केल्याची शक्यता आहे
काय आहे प्रकरण? केंद्रीय मंत्री रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली होती. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला बेदम चोप देण्यात आला.   त्यानंतर आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गोसावी या आठवलेंना धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget