एक्स्प्लोर

आठवलेंवरील हल्ल्यानंतर वातावरण तापलं, कार्यकर्त्यांकडून अंबरनाथ बंद

आरपीआय (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ बंद पुकारला असून शहरात सर्व दुकाने बंद आहेत. शहरात आरपीआय कार्यकर्त्यांनी लावले निषेधाचे फलक लावले आहेत.

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अंबरनाथमध्ये वातावरण तापले आहे. आरपीआय (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ बंद पुकारला असून शहरात सर्व दुकाने बंद आहेत. शहरात आरपीआय कार्यकर्त्यांनी लावले निषेधाचे फलक लावले आहेत. दरम्यान, आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याला काल रात्री उशिरा मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी गंभीर आहे.
या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून आरपीआय कार्यकर्ते सकाळपासून चौकाचौकात जमत बंदचं आवाहन करत आहेत. असे असले तरी रिक्षा युनियनने बंदमध्ये सहभागी होण्यास विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काल आठवलेंवर झालेला हल्ला हा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरपीआयचा आरोप असून जोपर्यंत स्थानिक एसीपी आणि डीसीपी यांना निलंबित केलं जात नाही, तोवर बंद सुरू राहील, असा इशारा आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष अजय जाधव यांनी दिला आहे.
ठाण्यातही कार्यकर्त्यांचा रास्तारोको 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील आनंदनगर जकात नाका येथे आठवले समर्थकांनी  घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ठाणे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याची पार्श्वभूमी -  प्रवीण गोसावी हा मूळचा अमरावती जिल्ह्यातला असून सध्या अंबरनाथच्या लक्ष्मीनगर भागात राहतो -  सुरुवातीला रिक्षाचालक होता, मनसे वाहतूक सेनेचा पदाधिकारी होता, आता बांधकाम व्यावसायिक आहे -  अंबरनाथ शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख
-  एकदा नगरपालिकेविरोधात उपोषण केलं , तर एकदा पालिकेच्या लिपिकाला एसीबीमार्फत पकडून दिलं आहे -  मनसेची भूमिका पटेनाशी झाल्यानं मनसेतून बाहेर पडला, त्यावेळीही राज ठाकरेंविरोधात फेसबुकवर लिखाण केलं -  यानंतर काही काळ आरपीआय आठवले गटात सक्रिय, मात्र त्यातूनही बाहेर पडला आणि आठवलेंविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत -  सध्या भारिप बहुजन महासंघात सक्रिय असून रामदास आठवलेंचा तिरस्कार अनेकदा त्याच्या बोलण्यातून आणि पोस्टमधून दिसून आलाय -  रामदास आठवले यांना समाजाशी देणं घेणं नसून फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करत असल्याचा गोसावी याचा आरोप आहे - याच रागातून त्याने काल आठवले यांच्यावर हल्ला केल्याची शक्यता आहे
काय आहे प्रकरण? केंद्रीय मंत्री रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली होती. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला बेदम चोप देण्यात आला.   त्यानंतर आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गोसावी या आठवलेंना धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget