एक्स्प्लोर

नवी मुंबईतील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रोला ग्रहण, दहा वर्ष झाली प्रकल्प रखडला

नागपूर मेट्रो प्रकल्प नवी मुंबईच्या नंतर सुरू होऊनही आधी पुर्णत्वास गेला. बेलापूर –पेंधर या मेट्रो लाईनचे काम हाती घेतल्यापासून तीन ठेकेदार बदलण्याची वेळ सिडकोवर आली आहे.


नवी मुंबई : एकविसाव्या शतकातील आधुनिक शहरातील ड्रीम प्रकल्प म्हणून मेट्रोला पाहिले जात होते. मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या प्रकल्पामुळे शहराला चार चांद लागणार होते. मात्र दहा वर्ष होत आली तरी सिडकोने सुरू केलेल्या मेट्रो प्रकल्पाला पुर्णविराम लागलेला नाही. चार वेळा डेडलाईन घोषित करणाऱ्या सिडकोला तीन ठेकेदार बदलावे लागले. रखडलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे दोन हजार कोटींचा प्रकल्प 3 हजार कोटींच्या वर गेल्याने तब्बल 1 हजार कोटींचा भूर्दंड सिडकोला लागला आहे. दुसरीकडे मेट्रोचे स्वप्न दाखवत सिडको आणि खाजगी बिल्डरांनी करोडोची घरे सर्वसामान्यांच्या गळ्यात मारली आहेत. मेट्रो सोडून दळणवळणासाठी दुसरी साधने नसल्याने खारघर, तळोजा भागातील रहिवाशांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. 

नवी मुंबई शहराचा विकास करताना पनवेल परिसरात पसरलेल्या उपनगरांना हार्बर रेल्वे मार्गाशी जोडण्यासाठी सिडकोने मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बेलापूर रेल्वे स्थानक तळोजा- पेंधर असा 12 किलो मीटर मेट्रो मार्ग बनविण्याचा काम हाती घेण्यात आले. 2011 साली सुरू झालेल्या या मेट्रो मार्गावर 11 रेल्वेस्थानक उभारण्यात येणार होते. मात्र दहा वर्ष होत आली तरी अद्याप मेट्रो प्रकल्प पुर्णत्वास गेलेला नाही. 

नागपूर मेट्रो प्रकल्प नवी मुंबईच्या नंतर सुरू होऊनही आधी पुर्णत्वास गेला. बेलापूर –पेंधर या मेट्रो लाईनचे काम हाती घेतल्यापासून तीन ठेकेदार बदलण्याची वेळ सिडकोवर आली आहे. त्यातच नवी मुंबई विमानतळाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याने सिडकोने मेट्रो रेल्वे उभारण्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले. खारघर, तळोजा, पेंधर भागात मेट्रो रेल्वे येणार असल्याचे स्वप्न दाखवत सिडकोने 25 ते 30 हजार घरे सर्वसामान्यांच्या गळ्यात मारली. 

दुसरीकडे खाजगी बिल्डरांनी मेट्रोचे फोटो आपल्या होम प्रोजेक्टमध्ये दाखवत चढ्या किंमतीला घरे विकून करोडो रूपयांचा मलिदा कमवला. मेट्रोतून प्रवास करायला मिळणार या आशेवर घरे विकत घेतलेल्या सर्वसामान्यांचा मात्र मेट्रो रखडल्याने चांगलाच हिरमोड झाला आहे. मेट्रो सोडून दुसरी दळणवळणाचे साधन उपलब्ध नसल्याने लोकांना रिक्षापोटी महिन्याला हजारो रूपये खर्च करावे लागत आहेत.

दरम्यान सिडकोने सध्या मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू केली आहे. तळोजा ते खारघर सेंट्रलपार्क  स्थानकादरम्यानच्या 505 किलो मीटर अंतरापर्यंत चाचणी करण्यात आली. या दरम्यान पाच रेल्वे स्थानके येत असून यावर मेट्रो धावणार आहे. सीबीडी ते तळोजा हे 11 किलो मीटरचे अंतर असून एकूण ११ मेट्रो रेल्वे स्थानके आहेत.

नवी मुंबई मेट्रो कामाची प्रत्यक्ष सुरवात 2011 साली झाली. 2011 रोजी मेट्रो प्रकल्पाची किंमत दोन हजार कोटी रुपये होती. 2021 रोजी मेट्रो प्रकल्पाची किंमत 3063 कोटींवर पोहोचली आहे. 2014, 2016, 2018, 2020, 2021 अशी पाच वेळा मेट्रो रेल्वे सुरू होण्याची डेडलाईन घोषित केली. सिडकोकडून एकूण 4 मेट्रो मार्ग घोषित करण्यात आले. याचा एकूण खर्च 8 हजार 904 कोटी रूपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget