एक्स्प्लोर

कोळीवाड्यांचे प्रश्न आतातरी सुटणार का? नारळी पोर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा चर्चा

Narali Purnima 2022 : कोळीबांधवांच्या घरांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून नवे सरकार यामध्ये दखल देणार का असा सवाल केला जात आहे. 

मुंबई : मुंबईतील कोळीवाड्यांचे (Mumbai Koliwada) सीमांकन, घरांचे पुर्नविकास, कोळीवाड्यातील जागांचे संरक्षण हे सगळे कोळीवाड्यातील प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकार दरबारी हे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा आगरी कोळी समाजाच्या समित्या आणि आगरी कोळी बांधव करत आहेत. अद्याप त्याला यश आलेलं नाही. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारकडून कोळीवाड्यांचे प्रश्न सोडवले जातील का? आगरी कोळी बांधवांच्या प्रश्नांकडे हे सरकार लक्ष देईल का? असे प्रश्न पडणारी चर्चा मुंबईत आज नारळी पौर्णिमेनिमित्त आहे.

मुंबईचे मूळ रहिवासी म्हणजे कोळी बांधव. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत या कोळी बांधवांचे 40 हून अधिक कोळीवाडे आहेत. वर्षानुवर्षे हे कोळी बांधव या ठिकाणी राहत असून ते त्यांचा परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. यातील अनेकांनी आता काळानुसार इतर ही उद्योग, नोकरी करण्यास सुरवात केली आहे. यांची कुटुंबही आता वाढू लागली आहेत. त्यामुळेच त्यांना सतावू लागला आहे तो घरांचा प्रश्न आणि आहेत त्या घरांच्या पूनर्विकासाचा प्रश्न. मात्र  राज्य सरकार योग्य पावला उचलत नाही आणि त्यातून विकास काही होत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा मुंबईचा मूळ रहिवासी चिंतेत आहे. अनेक सरकार आली आणि गेली, मात्र त्यांचा विकास झाला नाही. त्यामुळे या सरकारने तरी आमचा विकास करावा असं धारावी कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी बांधवाना वाटते.

आज सर्वत्र नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. त्यात अनेक ठिकाणी राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील उपस्थिती लावली. अशातच मुंबईतील वांद्रे पश्चिम खारदांडा येथे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्सव आयोजित केला होता. यावेळी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. त्यांनी आगरी कोळी बांधवांशी संवाद साधताना म्हटले की कोळीवाड्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असून नव्या सरकारच्या येण्याने प्रश्न अधिक जलदगतीने सुटतील.

कोळी आगरी समाज ही मुंबईची शान आहे अस सांगणारे, आगरी कोळी समाजाचे कैवारी आम्हीच असल्याचं दाखवणारे अनेक राजकीय पक्ष आणि पुढारी आज नारळी पौर्णिमा निमित्ताने अनेक ठिकाणी कोळीवाड्यांमध्ये पाहायला मिळाले. मात्र या आगरी कोळी बांधवांसमोर असणारे प्रश्न आणि त्यांचा रखडलेल्या विकासाची दखल पुढील काळात ही राजकीय मंडळी घेणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

 

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Embed widget