एक्स्प्लोर

Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट

Mumbai News: मुंबईतील उकाडा सध्या कमालीचा वाढल्याने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी वातावरण उष्ण आणि दमटच राहील. मुंबईकरांना आणखी दोन दिवस उकाड्याचा त्रास

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा उकाडा (Heat Wave) कधी कमी होणार, याची अनेकजण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील (Mumbai) तापमानात रविवारीही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम राहील. तसेच कमाल तापमान (Mumbai Temperature) 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत जोरदार पाऊस पडला होता. मात्र, काहीवेळासाठी पडलेल्या पावसाने मुंबईच्या हवेतील आद्रर्ता वाढायला सुरुवात झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या हवेत आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हवेतील उकडा मोठ्याप्रमाणावर वाढला आहे.  
मुंबईत शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी वातावरण उष्ण आणि दमटच राहील. त्यामुळे दोन्ही दिवस नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

मुंबईत शनिवारी किती तापमान होते?

मुंबईतील कुलाबा केंद्रात शनिवारी 34.4 अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात 34.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यात वीज आणि गडगडाटासह पाऊस

हवामान विभागाने जालना, बीड, नांदेड, धारशिव आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागांत रविवारी विजा आणि गडगडाटासह पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारपासून ते पुढील चार ते पाच दिवस विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मान्सून महाराष्ट्रात कधी येणार?

राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस झाला आहे. मात्र, मान्सून देशात आणि महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या तारखेला दाखल होणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. साधारण 20 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतील. त्यानंतर 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल. यानंतर सर्वकाही सुरळीत राहिल्यास 6 जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आणखी वाचा

पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
Embed widget