एक्स्प्लोर

पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान मुंबईला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण

Mumbai's first Climate Action Plan : 'नेट झिरो' लक्ष्य निश्चित करण्यासाठी भारतातील पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान मुंबईने मिळवला आहे.

Mumbai's first Climate Action Plan : 'नेट झिरो' लक्ष्य निश्चित करण्यासाठी भारतातील पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान मुंबईने मिळवला आहे. त्याचा शुभारंभ आज रविवार सायंकाळी ६ वाजता झाला.  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई वातावरण कृती आराखडा (MCAP) अहवालाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इकबाल सिंह चहल आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

2050 पर्यंत नेट-झिरो उत्सर्जन साध्य करणे हे एमकॅपचे उद्दीष्ट आहे. आधारभूत वर्षातील (2019) उत्सर्जन लक्षात घेता अंतरिम आणि दीर्घकालीन लक्ष्यानुसार 2030 पर्यंत उत्सर्जनात 30 टक्के घट, 2040 पर्यंत 44 टक्के घट आणि 2050 पर्यंत नेट-झिरो उद्दीष्ट साध्य करायचे आहे. आधारभूत वर्ष 2019 मध्ये एकूण 23.42 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन (CO2e) किंवा प्रतिव्यक्ती 1.8 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन मोजण्यात आले आहे.

वातावरण बदलानुसार क्षेत्रनिहाय अनुकूलता प्राप्त करणे आणि वातावरण बदलांच्या जोखमीची तीव्रता कमी करण्याच्या, नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना देण्यासाठी एमकॅप सहा क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करतो. ऊर्जा सक्षमता उभारणी अंतर्गत, एमकॅप मुंबईचे एनर्जी ग्रिड डिकार्बनाइज करणे आणि ऊर्जा सक्षमता उभारणी आणि बदलत्या वातावरणास सक्षम पायाभूत सुविधा यावर भर देतो. तर शाश्वत वाहतूक (Sustainable Mobility) अंतर्गत यंत्र विरहीत (नॉन मोटराइज्ड) वाहतूक सुविधा आणि शून्य उत्सर्जन इंधनावर ठोस जोर देत कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या वाहतूक पर्यायांना प्रोत्साहन देणे यावर भर देतो. शाश्वत कचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा व्यवस्थापनात शून्य जमीन भराव योजनेची अंमलबजावणी करण्याचा एमकॅप प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे, शहरातील हिरवाई आणि जैवविविधता संकल्पना ही पाणी-आरोग्य स्वच्छता याबाबतचे असमानत्व कमी करुन वातावरण बदलाच्या अनुषंगाने सक्षमता वाढविणे आणि पाणी संवर्धन आणि पूराच्या जोखीमींचे व्यवस्थापन करण्यासाठी निसर्गाधारित उपाययोजनांचा अंगीकार करणे यावर लक्ष केंद्रीत करते. तर शहरातील पूरपरिस्थिती आणि जल संसाधन व्यवस्थापन संकल्पना ही उष्णतेची जोखीम कमी करणे आणि शहरातील पूर घटनांदरम्यान सक्षमता वाढविणे यावर भर देते. हवा निरीक्षण यंत्रणा सुधारुन हवा प्रदूषण कमी करणे, प्रभावीपणे नियम लागू करणे आणि स्वच्छ तंत्रज्ञान वापरात आणणे याची एमकॅप कल्पना मांडते.  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget