एक्स्प्लोर

CM Eknath Shinde On Samruddhi Mahamarg: समोर साक्षात काळ उभा ठाकला होता, तरीदेखील...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग

CM Eknath Shinde On Samruddhi Mahamarg: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करताना आलेल्या एका प्रसंगाची आठवण सांगितली.

CM Eknath Shinde On Samruddhi Mahamarg: महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकापर्ण रविवारी, 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या पाहणी दरम्यान घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली. 'माझा कट्टा'वर बोलताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जुनी आठवण सांगितली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'माझा कट्टा'वर बोलताना मुंबई-नागपूर दरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्गाचा फायदा संपूर्ण राज्याला होणार असल्याचे सांगितले. हा महामार्ग राज्यात समृद्धी आणणारा असल्याचे सांगितले. राज्यासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एमएसआरडीसी खाते माझ्याकडे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवायची आहे, असे सांगितले. त्यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मु्ख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पात वन्यप्राण्यांची, पर्यावरणाची काळजी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई-नागपूरमधील प्रवासाचे तास कमी होणार असल्याने त्याचा फायदा सगळ्यांना होणार असल्याचे सांगितले. इंधन बचतीशिवाय, मालवाहतुकीसाठी पूर्वीच्या तुलनेत लागणारा वेळ कमी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

तेव्हा काळ उभा ठाकला होता...

समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना आलेल्या अनुभवाबाबत सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक प्रसंग सांगितला. समृद्धी महामार्गाची पाहणी करताना हेलिकॉप्टरमधून पुन्हा मुंबईच्या दिशेने येताना हवामान प्रतिकूल झाल्याने आम्ही अडचणीत आलो. त्यावेळी सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यावेळी समृद्धी महामार्गाची जबाबदारी असणारे अधिकारी मोपलवार आणि इतर अधिकारी घाबरले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांची भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करत होतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी मस्करीत त्यांना तुम्ही किती जमिनी खरेदी केल्या आहेत, असे विचारले होते. मात्र, त्यावेळी अधिकारी देवाचा धावा करत होते, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परिस्थिती प्रतिकूल होती मात्र, होईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी केली होती असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये: 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये इतकी आहे. या महामार्गावर प्राथमिक टप्प्यात 138.47 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रस्तावित आहे. राज्यातील 10 जिल्हे, 25 तालुके आणि 392 गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर 25 इंटरचेंज असून महामार्गालगत 18 नवनगरे असतील. महामार्गावर 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 32 पूल असून लहान पुलांची संख्या 317 आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किमी असून रुंदी 120 मीटर (डोंगराळ भागासाठी 90 मी.) आहे. यात 3+3 अशा 6 मार्गिकांचा समावेश असून त्यावर वाहनाचा प्रस्तावित वेग प्रति तास 120 किमी असणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget