एक्स्प्लोर
Advertisement
रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत
जे मनात होतं, तेच बोललो, वेगळं काहीही बोललो नाही, मी पक्ष सोडत नाही, असंही हाजी अराफत यांनी स्पष्ट केलं
मुंबई : शिवसेनेच्याच कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचे वाभाडे काढणारे शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. या वक्तव्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचं अराफत यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं आहे.
जे मनात होतं, तेच बोललो, वेगळं काहीही बोललो नाही, मी पक्ष सोडत नाही, असंही हाजी अराफत यांनी स्पष्ट केलं. माझ्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, माझी-त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काय होतंय ते बघू. मी फार जुना कार्यकर्ता आहे, माझ्यासोबत आलेले अनेक जण पक्ष सोडून गेले, असंही ते म्हणाले.
मी भावनिक होऊन बोललो, असं काही ठरवून बोललो नाही, असंही हाजी अराफत शेख यांनी सांगितलं.
भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर
उद्धव ठाकरेंच्या आदेशावरुनच सर्व वाहतूक संघटनांचं नेतृत्व आपल्याला मिळालं, मात्र पक्षात उद्धव ठाकरेंचे तरी आदेश मानले जातात का? असा प्रश्नही अराफत यांनी विचारत पक्षसंघटनेला घरचा आहेर दिला. हाजी अराफत यांनी बुधवारी संघटनेच्या कार्यक्रमात दिवाकर रावतेंवर जोरदार टीका केली होती. परिवहन मंत्र्यांनी गेल्या तीन वर्षांत रिक्षा चालकांसाठी एक स्टँड तरी बांधला का? असा सवाल त्यांनी केला होता. या वक्तव्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याची प्रतिक्रिया हाजी अराफत यांनी दिली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement