एक्स्प्लोर

Raj Thackeray: 2011 पासून सुरु असेलेल्या मुंबई गोवा महामार्ग राज ठाकरेंना आताच का महत्वाचा ?

Mumbai Goa National Highway:  नुकतच समृद्धी महामार्गाचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यात मात्र गेल्या सोळा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.

Mumbai Goa National Highway:  नुकतच समृद्धी महामार्गाचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यात मात्र गेल्या सोळा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करत, काम कधी पूर्ण होणार? असा सवाल उपस्थित करत, हा पूर्ण व्हावा अशी मागणी केलीय. मात्र राज ठाकरे यांनी आत्ताच ही मागणी करण्याचे कारण काय? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पाहूया त्यावरचा विशेष रिपोर्ट.

राजकारणाची दिशा विकासाकडे वळविण्याचा प्रयत्न समृद्धीच्या माध्यमातून झाला. त्याचवेळी कोकणातील अविकासाचीही चर्चा होऊ लागली आहे. एकीकडे सुस्साट जाणारा समृद्धी महामार्ग आणि दुसरीकडे ठेचकाळत, हेलकावत जाणार्‍या वाहतुकीची रखडपट्टी करणारा, कोकणाचे भाग्य बदलणारा मुंबई -गोवा महामार्ग याची तुलना होऊ लागली. मात्र बारा वर्षांपूर्वी 2011 मध्ये मुंबई -गोवा महामार्गाचे काम सुरू झाले. मात्र अजूनही याला महामार्ग म्हणावे अशी स्थिती नाही, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा आता लावून धरला आहे.

मुंबईला कोकणाशी जोडणारा, कोकणाच्या शेतीत, उद्योगात समृद्धी आणणारा हा  महामार्ग आहे. मात्र तो गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने कोकण वासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात कोकणवासीय गेल्या अनेक वर्षांपासून राहतात, मात्र एक रस्ता माय भूमीत जायला राज्यकर्ते इतक्या वर्षात करू शकले नाहीत याची  खंत ते व्यक्त करतात अन् त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या तोंडावर हा मुद्दा हाती  घेतल्याची जोरदार चर्चा आहे.

कोकणात गेल्या अनेक वर्षांपासून वाईला हवी तशी प्रगती आणि विकास झाला नाही. हीच बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरोबर हेरली. कारण नुकतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विशेष कोकण दौरा केला आणि त्या ठिकाणचे प्रश्न आणि समस्या या जाणून घेतल्या. मुंबई महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यातच पार पडतील. मुंबईत कोकण वासियांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यात सर्वच पक्ष मुंबईतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न करतायत. मनसेचा मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा, हा कोकणातील चकरमण्यांची मतं मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता या नवीन वर्षात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आणि कोकणातील आपले पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोकणात दोन सभा घेणार आहेत. या सभांमधून राज ठाकरे कोकण वासियांना काय सांगतात आणि कोकण वासियांची  मन कशाप्रकारे जिंकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वर्षानुवर्षे कोकणाचा विकास न करणारे, साधा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करू शकणाऱ्यांना आजपर्यंत कोकणी माणसांनी निवडून दिलं.पण आता त्यांना नाकारून एक नवा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने उभा राहत आहे असा विश्वास राज ठाकरे यांनी कोकण दोऱ्यावर असताना कोकणवासीयांना दिला. त्यामुळे जर महामार्गाच्या कामाला वेग आला तर मनसे याच क्रेडिट आगामी काळात करुन घेईल असं दिसत आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Vedpathak White Line Controversy: मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार
मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Embed widget