एक्स्प्लोर

Raj Thackeray: 2011 पासून सुरु असेलेल्या मुंबई गोवा महामार्ग राज ठाकरेंना आताच का महत्वाचा ?

Mumbai Goa National Highway:  नुकतच समृद्धी महामार्गाचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यात मात्र गेल्या सोळा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.

Mumbai Goa National Highway:  नुकतच समृद्धी महामार्गाचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यात मात्र गेल्या सोळा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करत, काम कधी पूर्ण होणार? असा सवाल उपस्थित करत, हा पूर्ण व्हावा अशी मागणी केलीय. मात्र राज ठाकरे यांनी आत्ताच ही मागणी करण्याचे कारण काय? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पाहूया त्यावरचा विशेष रिपोर्ट.

राजकारणाची दिशा विकासाकडे वळविण्याचा प्रयत्न समृद्धीच्या माध्यमातून झाला. त्याचवेळी कोकणातील अविकासाचीही चर्चा होऊ लागली आहे. एकीकडे सुस्साट जाणारा समृद्धी महामार्ग आणि दुसरीकडे ठेचकाळत, हेलकावत जाणार्‍या वाहतुकीची रखडपट्टी करणारा, कोकणाचे भाग्य बदलणारा मुंबई -गोवा महामार्ग याची तुलना होऊ लागली. मात्र बारा वर्षांपूर्वी 2011 मध्ये मुंबई -गोवा महामार्गाचे काम सुरू झाले. मात्र अजूनही याला महामार्ग म्हणावे अशी स्थिती नाही, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा आता लावून धरला आहे.

मुंबईला कोकणाशी जोडणारा, कोकणाच्या शेतीत, उद्योगात समृद्धी आणणारा हा  महामार्ग आहे. मात्र तो गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने कोकण वासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात कोकणवासीय गेल्या अनेक वर्षांपासून राहतात, मात्र एक रस्ता माय भूमीत जायला राज्यकर्ते इतक्या वर्षात करू शकले नाहीत याची  खंत ते व्यक्त करतात अन् त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या तोंडावर हा मुद्दा हाती  घेतल्याची जोरदार चर्चा आहे.

कोकणात गेल्या अनेक वर्षांपासून वाईला हवी तशी प्रगती आणि विकास झाला नाही. हीच बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरोबर हेरली. कारण नुकतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विशेष कोकण दौरा केला आणि त्या ठिकाणचे प्रश्न आणि समस्या या जाणून घेतल्या. मुंबई महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यातच पार पडतील. मुंबईत कोकण वासियांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यात सर्वच पक्ष मुंबईतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न करतायत. मनसेचा मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा, हा कोकणातील चकरमण्यांची मतं मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता या नवीन वर्षात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आणि कोकणातील आपले पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोकणात दोन सभा घेणार आहेत. या सभांमधून राज ठाकरे कोकण वासियांना काय सांगतात आणि कोकण वासियांची  मन कशाप्रकारे जिंकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वर्षानुवर्षे कोकणाचा विकास न करणारे, साधा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करू शकणाऱ्यांना आजपर्यंत कोकणी माणसांनी निवडून दिलं.पण आता त्यांना नाकारून एक नवा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने उभा राहत आहे असा विश्वास राज ठाकरे यांनी कोकण दोऱ्यावर असताना कोकणवासीयांना दिला. त्यामुळे जर महामार्गाच्या कामाला वेग आला तर मनसे याच क्रेडिट आगामी काळात करुन घेईल असं दिसत आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget