Mohan Bhagwat : जगात मानवता हा एकच धर्म, सध्या त्याला हिंदू म्हणतात, दृष्टांचे निर्दालन झालंच पाहिजे: मोहन भागवत
Mohan Bhagwat RSS : पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या, पण हिंदू असं कधीच करणार नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले.

मुंबई : वेगळेपणाला धरुन जेव्हा जातो त्यावेळी समाजातील अंतर वाढते. एकतेच्या सूत्राला धरुन चाललं की आपलेपणा वाढतो. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता. त्यालाच आपण हिंदू (Hindu Religion) असं म्हणतो असं मोहन भागवत म्हणाले. यावेळी क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे. ती पूर्ण होईल असं मोहन भागवत (Mohan Bhagwat RSS) म्हणाले. ते मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यावर मोहन भागवतांनी भाष्य केलं. आपण सगळे एक असून तर कुणीही आपल्याकडे डोळं वाकडे करुन बघणार नाही असं ते म्हणाले.
रावणाला मारण्याशिवाय पर्याय नव्हता
मोहन भागवत म्हणाले की, "लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे. काल धर्म विचारून मारलं. हिंदू असं कधीही करणार नाही. आपल्या मनात दुख आहे. आमच्या मनात क्रोध आहे. असुरांचे निर्दालन व्हायचे असेल तर अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे. रावण त्याचे मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचे वध केला."
यावेळी अपेक्षा पूर्ण होतील
मोहन भागवत पुढे म्हणाले की, "आता क्रोधही आहे आणि अपेक्षाही आहे. यावेळी अपेक्षा पूर्ण होईल असेही वाटते. समाज एक असेल तर कुणी डोळं वाकडं करुन पाहणार नाही. वाकडं कुणी पाहीलं तर डोळा फुटेल. त्याला दमदार उत्तर देऊ अशी अशी अपेक्षा. द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. तसा मार खाणे हाही आपला स्वभाव नाही. शक्तिवान माणसाने अहिंसक असले पाहिजे. शक्तिहिनाला त्याची गरज नाही. शक्ती आहे ती अशा वेळी दिसली पाहिजे."
नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाल्याची कबुली केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत दिली आहे. काश्मीरमधल्या हल्ल्यानंतर सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक दोन तास चालली. त्यात हल्ला झाला तेव्हा सुरक्षा दल, सीआरपीएफ कुठं होतं, मदत पोहोचण्यात उशीर का झाला? अशा प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षांनी केली. त्यावर सुरक्षेत त्रुटी राहिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मान्य केलं. त्याचा शोध घेण्याची हमीही त्यांनी विरोधकांना दिली. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल, त्यासाठी आपण सरकारच्या सोबत आहोत असं आश्वासन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधकांनी दिलं.























