एक्स्प्लोर

संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल, तर हे चुकीचं : राज ठाकरे

संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे चुकीचं आहे. या सर्वांना आता महाराष्ट्रातून जाऊ नये. आज त्यांची महाराष्ट्राला त्यांची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबई : मुंबईवर कोरोनाचं संकट आल्यावर परराज्यातून आलेले आता आपल्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रात एवढी वर्ष राहिले आणि पैसे कमवले. मात्र आता संकट आल्यावर आपल्या राज्यात जाण्याचा विचार करणार. मात्र हे परप्रांतीय मुंबईतून निघून गेल्यावर त्यांची कामं कोण करणार आहे. महाराष्ट्राने परराज्यातून येणाऱ्या लोकांवर अलंबून राहण्यावर विचार करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.

संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे चुकीचं आहे. या सर्वांना आता महाराष्ट्रातून जाऊ नये. आज त्यांची महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. संकटकाळात ज्या राज्याने तुम्हाला सर्व काही दिलं त्याला सोडून का जात आहात? असंही राज ठाकरेंनी विचारलं.

परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येण्यास माझा विरोध नाही. मात्र परप्रांतीय सुरुवातीला मान खाली घालून येतात, नंतर मान वर करुन दादागिरी करतात हे चालणार नाही. नोकरी-धंदा करण्यासाठी येताय त्यांना कुणी विरोध करत नाही. मात्र एवढी वर्षे महाराष्ट्राचे राहत आहात, तर इथले व्हा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? कोरोना असा संपणार नाही : राज ठाकरे

लॉकडाऊन वाढवून प्रश्न सुटणार आहेत का? लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढवणार? त्यामुळे कोरोना संपणार आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. सरकारच्या नियोजनातही काही त्रुटी आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकानं दिवसभरात अवघी काही तास उघडी ठेवली तर लोक गर्दी करणारच. लोकांना काही मोकळीक दिली तर लोक सर्व नियम पाळून कोरोनापासून बचाव करतील आणि सर्व सुरळीत सुरु राहिल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

लॉकडाऊन किती वेळ सुरु ठेवणार यालाही काही मर्यादा असायला हव्यात. अजून किती दिवस लॉकडाऊनमध्ये घालवणार. सर्व गोष्टी बंद ठेऊन देशाचं आणि राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अपघातांमध्ये दरवर्षी अनेक लोक मरतात, मग कुणी गाडी, रेल्वेत बसायचं बंद करतं का? कोरोनाचा परिणाम किती आहे, त्यात मृत्यूचं प्रमाण किती आहे. सरकारनेही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. कोरोना असा लगेच जाणार असं वाटत नाही. त्यामुळे योग्य खबरदारी आणि काळजी घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. कोरोना कधी संपेल यावर लॉकडाऊन अवलंबून नसावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!

व्हिडीओ

Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूसच, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूसच, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
Embed widget