एक्स्प्लोर

जातीनिहाय जनगणना व्हावी का? तज्ज्ञांना काय वाटतं?

2021 साली देशाची जगगणना केला जाणार आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यास सर्व पक्षांनी संमती दिल्‍याने एकमताने केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

मुंबई : दर दहा वर्षांनी देशात जनगणना होते. त्यानुसार 2021 ला देशात जनगणना होणार आहे. स्वतंत्र भारतात जातीनिहाय जनगणनेला सातत्याने विरोध केला गेला. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यास सर्व पक्षांनी संमती दिल्‍याने एकमताने केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या समजणे आवश्यक आहे. त्यानंतरच ओबीसींसाठी कल्‍याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील. ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी आपली भेट घेऊन ही मागणी केली होती.

एबीपी माझाच्या 'माझा विशेष' या कार्यक्रमात याच विषयावर चर्चा करण्यात आली. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, जातनिहाय जनगणना प्रत्येक दहा वर्षांनी केली जावी. मात्र ओबीसींची जनगणना व्हावी याला आमचा विरोध नाही. मात्र असं केल्याने जातीजातीचा संर्घष निर्माण होईल. जातीय राजकारण यातून निर्माण होईल. फक्त ओबीसींची जनगणना व्हावी हे चुकीचं आहे. सर्वांना समान संधी मिळायला हवी. वंचित घटनाकांची जनगणना होणंही गरजेचं आहे.

ओबीसींची जनगणना व्हावी, याला आमचा विरोध आहे. ही महाराष्ट्रासाठी चुकीची गोष्ट आहे. कारण नसताना ओबीसीची जनगणना व्हावी याचा आम्ही निषेध करतो. इतर राज्यांमध्ये ओबीसींची संख्या खुप जास्त आहे, मात्र तिथेही ओबीसींचा विकास झालेला नाही. जनगणना करायची असेल तर सर्व जातींची व्हावी, मात्र त्यातून देशाचं भलं होणार नाही. आज एकही जात आरक्षणाबाहेर नाही, त्यामुळे आरक्षणाचा निकष लावला तरी सर्व जातींची जनगणना करावी लागेल, असं मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे-पाटील यांनी मत मांडलं.

प्रत्येक जातीची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जनगणना जातीनिहाय झाली तर समोर येईल. अनेक जातींची सध्याची अवस्था यातून स्पष्ट होईल. मागास जातीचा समान संधी मिळावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी जातनिहाय जनगणना होण्याची गरजेची आहे. एखादी मागास जात असेल तर त्या जातीला न्याय दिला पाहिजे, असं माजी माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Mumbai Family death Watermelon: मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे 'फुड पॉयझनिंग'ची शक्यता; आयुर्वेद तज्ञांचा अंदाज
मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे 'फुड पॉयझनिंग'ची शक्यता; आयुर्वेद तज्ञांचा अंदाज

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
Embed widget