एक्स्प्लोर

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाला भोपळा, महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत असतानाच आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील शिखर बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाच्या हाती भोपळा लागला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारत कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. 18 पैकी 16 संचालकांच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत असतानाच आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. तर दुसरीकडे भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सर्वच महसूल विभागात भाजपाचा पराभव होत असताना नागपूर मधील बालेकिल्ल्यातही भाजपाला आपला उमेदवार निवडून आणता आलेला नाही. यामुळे भाजपाच्या हाती भोपळा लागला असून महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची उमेद वाढवणारा निकाल ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भाजपाने ताकद लावली होती. बाजार समितीवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्वाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न भाजपाने केला . मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आले. शिवसेनेला बरोबर घेत राष्ट्रवादीने बाजार समिती निवडणुकीची मोट बांधत भाजपाला कात्रजचा घाट दाखवला आहे. 18 संचालकापैकी 12 संचालक शेतकरी प्रतिनिधी, पाच संचालक व्यापारी प्रतिनिधी, 1 संचालक कामगार प्रतिनिधी असणार आहे. सभापती पद हे कायद्याने शेतकरी प्रतिनिधीलाच भूषविता येते. सहा वर्षानंतर मुंबई बाजार समितीवर संचालक मंडळांची नियुक्ती झाल्याने शेतकरी वर्गाला न्याय मिळेल अशी आशा आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडून मुंबई बाजार समितीत पाठविण्यात येणाऱ्या शेतमालाला योग्य भाव देणे, त्याच्या मालाचे संरक्षण करणे, व्हेअरहाऊस उभा करून नाशवंत मालाचा दर्जा राखण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करील अशा आशा आहे. विभागवार विजयी उमेदवार खालील प्रमाणे पुणे विभाग - 1) बाळासाहेब सोळस्कर - राष्ट्रवादी कॉंग्रेस 2) धनंजय वाडकर - काँग्रेस कोकण विभाग - 1) राजेंद्र पाटील - शेकाप 2) प्रभाकर पाटील - अपक्ष ( शिवसेना बंडखोर ) नाशिक विभाग - 1) अद्वैत हिरे - अपक्ष 2) जयदत्त होळकर - राष्ट्रवादी कॉंग्रेस औरंगाबाद विभाग - 1) अशोक डक - राष्ट्रवादी कॉंग्रेस 2) वैजनाथ शिंदे - काँग्रेस अमरावती विभाग - 1) प्रविण देशमुख - काँग्रेस 2) माधवराव जाधव - शिवसेना नागपूर विभाग - 1) सुधीर कोठारी - राष्ट्रवादी काँग्रेस 2) हुकूमचंद आमधरे - काँग्रेस पक्ष वाशी बाजार समिती 1) फळ मार्केट - संजय पानसरे 2) भाजीपाला मार्केट -शंकर पिंगळे 3) कांदा बटाटा मार्केट -अशोक वाळूंज 4) दाणा मार्केट - निलेश विरा 5) मसाला मार्केट - विजय भूता कामगार प्रतिनिधी - शशिकांत शिंदे - बिनविरोध APMC Market Election | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा आज निकाल संबंधित बातम्या :  नगरमधील शेतकऱ्यांची एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक डाळी शंभरी पार, पावसाचा फटका बसल्याने येत्या काळात डाळींच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Speech : मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू, असेल हिम्मत तर आत टाकून दाखवा
Local Body Election:राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर,अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित
Shahajibapu Patil Sangola News : सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री छापे
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Buldhana BJP : कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Jaya Bachchan On Marriage: 'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
Elections 2025 : मुंबईतील 7 हजारांहून अधिक मतदारांचे वॉर्ड बदलले; प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना, माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर
मुंबईतील 7 हजारांहून अधिक मतदारांचे वॉर्ड बदलले; प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना, माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर
Gunratna Sadavarte : सक्षम ताटेच्या आई-वडील आणि आचलला संरक्षण द्यावं, कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
सक्षम ताटेच्या कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
Embed widget