एक्स्प्लोर

मी पुन्हा येईन म्हणाले, पण कुठे बसणार ते सांगितलं नव्हतं; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

विधीमंडळाच्या अधिवेशनातील भाषणात बोलताना जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

मुंबई : मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राज्यात सरकार स्थापन झालं आहे. काल (30 नोव्हेंबर) विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यभ नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणात बोलताना जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्ष चांगले काम केले. याआधी त्यांनी प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम केलं आहे. त्याचा फायदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवताना झाला. आमच्या काळात आम्ही प्रसिद्धीसाठी निधी ठेवला होता. परंतु आमच्या बाबांनी सांगितले इतका पैसा प्रसिद्धीवर खर्च करायचा नसतो, असं सांगत पाटलांनी फडणवीसांना चिमटा काढला. तसेच भाजपने प्रसिद्धीवर केलेल्या अमाप खर्चावर बोट ठेवले. पाटील म्हणाले की, फडणवीसांनी मी पुन्हा येईन असे सांगितले होते, परंतु कुठे बसेन ते सांगितलं नव्हतं. आता पुढची पाच वर्ष त्यांनी इकडे येण्याचा प्रयत्न करु नये. फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड योग्य आहे. 2014 मध्ये भाजप आमदारांमधून तुमची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. यावेळीदेखील भाजप आमदारांपैकी विखे पाटील यांना वगळून तुमची निवड करण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील हे आमचेच आहेत, त्यांच्यात आणि आमच्यात अंतर नाही. त्यांना आम्ही ओढून आणू, असे म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. जयंत पाटलांची अधिवेशनातील टोलेबाजी पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या FDA च्या कारवाईचा धडाका, मुंबईतील नायर रुग्णालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित, पुणे आणि अकोल्यातून अन्नसाठा जप्त
तुकाराम मुंढे यांच्या FDA च्या कारवाईचा धडाका, मुंबईतील नायर रुग्णालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित, पुणे अकोल्यातही कारवाई
दिशा सालियनचे वडील सतिश सालियन मातोश्रीवर जाणार, आदित्य ठाकरेंना मानहानीची नोटीस देणार
दिशा सालियनचे वडील सतिश सालियन मातोश्रीवर जाणार, आदित्य ठाकरेंना मानहानीची नोटीस देणार
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget