एक्स्प्लोर

Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले

Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबर विभागानं तब्बल सर्वसामान्य नागरिकांचे तब्बल 119 कोटी रुपये वाचवण्यात यश मिळवलं आहे.

मुंबई : वीज बील भरण्यापासून मोबाईलच्या रिजार्जपर्यंत अनेक गोष्टी एका आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. डिजिटलायझेशनच्या युगात नवतंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करुन अनेक जणांकडून फसवणूक केली जाते. नागरिकांच्या फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात. त्यामुळं अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. मात्र, महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागानं अशा सायबर गुन्हेगारांना दणका दिला आहे. नागरिकांकडून येणाऱ्या  तक्रारींवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 119 कोटी रुपये वाचवण्यात यश मिळवलं आहे.
 
‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल’ (एनसीसीआरपी) आणि मदत 'क्रमांक 1930' वर गेल्या तीन महिन्यांत 64 हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  मुंबई वगळता संपूर्ण राज्यातून या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींसंदर्भात तात्काळ कारवाई करून सायबर फसवणूकीतील 119 कोटी रुपये वाचविण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाचे नवी मुंबईतील महापे येथे आत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. त्यात 150 हून अधिक कर्मचारी व सायबर तज्ज्ञ 24 तास कार्यरत असतात. या मदत क्रमांकावर दररोज सरासरी आठ हजार दूरध्वनी येत आहेत. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर बँका आणि संबंधित विभागाशी संपर्क साधून फसवणूकीची रक्कम तात्काळ थांबवण्याचे प्रयत्न करण्यात येतात. 

गेल्या तीन महिन्यांत एकूण 64 हजार 201 सायबर फसवणूकीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यात 1085 कोटी 32 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी 119 कोटी 60 लाख रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे. याशिवाय 1930 मदत क्रमांकावर 1581 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 100 टक्के म्हणजे 2 कोटी 46 लाख रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आलं आहे. 

नागरिकांच्या फसवणुकीच्या प्राप्त झालेल्या 28 हजार 209 तक्रारींमध्ये सुमारे 2716 मोबाइल क्रमांक बंद करण्यात आले आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यानंतर दोन तासांमध्ये मदत क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सायबर फसवणूकीतील रक्कम तात्काळ वाचवणे शक्य होते.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावं?

अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आल्यास वैयक्तिक माहिती देणं टाळा.

फोनवरुन आधार कार्ड क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक आणि ओटीपी अनोळखी व्यक्तीला सांगू नका.

बँका किंवा आर्थिक संस्थांकडून ओटीपीची फोनवरुन मागणी केली जात नाही.

मोबाईलवर व्हाटसअपद्वारे येणाऱ्या अनधिकृत अॅप्लिकेशन्सचं इन्साटलेशन टाळा.

तुमच्या वायफायचा पासवर्ड देखील शेअर करणं टाळा.

इतर बातम्या :

Cidco Homes Lottery 2025 : शेवटची संधी चुकवू नका, सिडकोच्या 26000 घरांच्या नोंदणीसाठी दोन दिवस बाकी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget