एक्स्प्लोर

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज, आदित्य ठाकरेंच्या हाती स्टिअरिंग, उद्धव ठाकरे 8 मिनिटात 'वर्षा'वर

CM Uddhav Thackeray Discharged : यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 22 दिवसांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी परतले.

CM Uddhav Thackeray Discharged : Mumbai : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना तब्बल 22 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी  मणक्याची शस्त्रक्रिया झाली. मुंबईच्या गिरगावातील प्रसिद्ध  एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. यादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आणि मुलगा आदित्य ठाकरे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवली. साधारण 10 वाजून 34 मिनिटांनी मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह रुग्णालयातून बाहेर पडले. गिरगाव ते वर्षा बंगला हे जवळपास 4 किमीचं अंतर त्यांनी 8 मिनिटात पार केलं. मुख्यमंत्र्यांचा ताफा 10 वाजून 42 मिनिटांनी वर्षा बंगल्यावर दाखल झाला.    

पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुख्यमंत्र्यांवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याचं सांगण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर मणक्याशी संबंधित महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ. शेखर भोजराज यांनी मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया केली आहे. 

रुग्णालयातून मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 22 दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. यादरम्यान त्यांनी राज्याचा कारभार रुग्णालयातून पाहिला. उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीला रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या बैठकीत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन, शाळा सुरु करणे अशा विषयांवर चर्चा झाली होती.   

बेमोसमी पाऊस, अधिवेशन ते ओमायक्रॉनचं संकट  

राज्यात सध्या बेमोसमी पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याशिवाय राज्याचं हिवाळी अधिवेशनही तोंडावर आहे. येत्या 22 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यातच जगावर ओमायक्रॉन व्हेरिएंटचं संकट आहे. अशा विविध संकटातून राज्य जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Embed widget