एक्स्प्लोर

Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha : महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्यांचा मास्टरमाईंड कोण? मविआच्या विराट मोर्चात अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha : राज्यपाल बोलल्यानंतर मंत्री बोलतात, भीकेची उपमा देतात, जनाची नाही, तरी मनाची वाटायला हवी, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्ला चढवला.  

Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha : आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाने राज्यकर्त्यांना धडकी भरली असेल, महापुरुषांबाबत सातत्याने अपमानास्पद बोललं जात आहे. राज्याचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. गरळ ओकण्याचे, बेताल वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. यामागे कोण मास्टरमांईड हे शोधण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील नागरिक चुकल्यास दिलगिरी व्यक्त करतो, पण इथं घडताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर मंत्री बोलतात, भीकेची उपमा देतात, जनाची नाही, तरी मनाची वाटायला हवी, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar In Maha Vikas Aghadi Morcha) हल्ला चढवला.  

महाविकास आघाडीकडून आज मुंबईत राज्यपाल हटाव तसेच महापुरुषांविरोधात होणाऱ्या बेताल वक्तव्याविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना अजित पवार यांनी सरकारवर कडाडून प्रहार केला. कोश्यारी हटाव, महाराष्ट्र बचाव! असा नाराही अजित पवारांनी दिला. येत्या हिवाळी अधिवेशानात महापुरुषांच्या अपमानाविरोधात कडक कायदा करावा लागला, तरी चालेल. विरोधी पक्ष त्यांना पाठिंबा देतील, सरकारनेही तसे विधेयक आणावे, असेही ते म्हणाले. 

सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न असताना अचानक भाषा कशी सुरु झाली, याचा विचार जनतेनं केला पाहिजे. एकसंध महाराष्ट्रातील गावे वेगळी भाषा बोलत आहेत, देशात महाराष्ट्र वेगळा आहे, साधू संतांचा वारसा असून सीमाभागातील अन्याय खपवून घेणार नाही. शिंदे सरकारमध्ये महापुरुषांचा अपमान केला जात आहे. बोम्मईंचे ट्विट खोटं असल्याचे सांगतात, कर्नाटक बँकेत खाती उघडण्यास सांगतात, या सरकारला जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात अजित पवारांनी हल्ला चढवला. 

अजित पवार म्हणाले की, ही वेळ का आली? याचा विचार करण्याची गरज आहे. महापुरुषांबाबत सातत्याने अपमानास्पद बोललं जात आहे. राज्याचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. गरळ ओकण्याचे, बेताल वक्तव्ये सातत्याने केली जात आहे. यामागे कोण मास्टरमांईड हे शोधण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील नागरिक चुकल्यास दिलगिरी व्यक्त करतो, पण इथं घडताना दिसत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर मंत्री बोलतात, भीकेची उपमा देतात, जनाची नाही, तरी मनाची वाटायला हवी. 

अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यपाल हटाव तसेच महापुरुषांच्या अपमानकारक वक्तव्याविरोधात पुणे बंद होते. वेगवेगळी शहरे बंद होत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठेवली पाहिजे, पण आजच्या मोर्चाने राज्यकर्त्यांना धडकी भरली असेल. राज्यपालांना हटवलं पाहिजे. माफी मागितली पाहिजे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Sitaram Dalvi passed away: शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
Sitaram Dalvi passed away: शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
Nashik News : हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Chaitanya Maharaj Wadekar: चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur : Rahul Gadhi यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरणRahul Gandhi Kolhapur Speech : भाजपनं शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवणमधला पुतळा पडलाNandurbar News : नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, राजेंद्र गावित यांच्या बंधूंचा पक्षाला रामरामPun Crime News Bopdev Ghat : बोपदेव घाटातील सामुहिक अत्याचार प्रकरणी सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Sitaram Dalvi passed away: शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
Sitaram Dalvi passed away: शिवसेनेचा जुना शिलेदार हरपला, माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन
Nashik News : हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Chaitanya Maharaj Wadekar: चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
Rahul Gandhi in Kolhapur: शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी
शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी
Ahmednagar News : भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
NIA ATS Raids in Maharashtra : मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
Embed widget