![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Lockdown | प्रवासाची परवानगी मागणारे दोन लाख अर्ज मंजूर, तर 70 हजार अर्ज प्रलंबित
लॉकडाऊनमध्ये अनेक लोक आहे त्या ठिकाणीच अडकले. काहींच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे तर काहींची आपल्या मुला-बाळांपासून ताटातूट झाली. आतापर्यंत दोन लाख अर्जांना परवानगी देण्यात आली आहे तर अजूनही 70 हजार अर्ज पोलिसांकडे प्रलंबित आहेत.
![Lockdown | प्रवासाची परवानगी मागणारे दोन लाख अर्ज मंजूर, तर 70 हजार अर्ज प्रलंबित Lockdown - Maharashtra police received 70 thousand application to seek travelling permission Lockdown | प्रवासाची परवानगी मागणारे दोन लाख अर्ज मंजूर, तर 70 हजार अर्ज प्रलंबित](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/20224851/maharashtra-police.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले. आतापर्यंत अशा दोन लाख अर्जांना राज्यातल्या राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर विविध कारणासाठी प्रवासाच्या परवानगीसाठी 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत.
आपल्याच राज्यात एके ठिकाणाहून दुसरीकडे जायला परवानगी मागावी लागेल अस कधी कुणाला वाटलं नसेल, पण कोरोनाने ती वेळ आणली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र लॉकडाऊन इतका वाढेल याची कल्पना नसल्याने अनेक जण आहे त्या ठिकाणी अडकले. आपल्या मुला-बाळांना गावाला पाठवलं होतं.
परीक्षा रद्द झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना आजोळी पाठवलं होत. तर कोणी कामासाठी शहराबाहेर गेलं होतं. कोणी शहरात काम करतं आणि कुटुंबीय गावात अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे किमान राज्यातल्या राज्यात प्रवास करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत.
आतापर्यंत अशा दोन लाख अर्जांना राज्यातल्या राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पातळीवरील प्रशासनाला दिले आहेत. मेडिकल इमर्जन्सी आणि घरात कुणाचे निधन झाले असल्यास या कारणासाठी फक्त पोलीस प्रवासासाठी परवानगी देत आहे. मात्र विविध कारणासाठी प्रवासाच्या परवानगीसाठी 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत.कामकाज करण्याची परवानगी असलेल्यांना प्रवास परवानगी पास मिळणार
सरकार अतिमहत्त्वाच्या कारणांसाठी काही जणांना अटींसह प्रवासाची परवानगी देत आहे. त्यानुसार आतापर्यंत दोन लाख अर्जांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र अजूनही प्रवासाच्या परवानगीसाठी 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकार यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागेल.
दरम्यान, देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक वगळता सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे.
Lockdown | राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे तब्बल 70 हजार अर्जमहत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)