एक्स्प्लोर

कल्याणचा पत्री पूल अखेर इतिहासजमा

ब्रिटीशांनी 1914 साली उभारलेला हा पूल संपूर्णपणे लोखंडाचा असल्यानं त्याला पत्री पूल असं नाव पडलं. कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांना जोडण्यासाठी पत्री पूल हा एकमेव दुवा होता. यावर्षी पत्री पूल धोकादायक असल्याची बाब समोर आली होती.

कल्याण : कल्याणचा ऐतिहासिक पत्री पूल आज अखेर इतिहासजमा झाला आहे. रेल्वे प्रशासनानं तब्बल सहा तासांचा महामेगाब्लॉक घेऊन पत्री पुलाचा गर्डर उचलला. आता या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याचं आव्हान एमएसआरडीसी समोर असणार आहे.

ब्रिटीशांनी 1914 साली उभारलेला हा पूल संपूर्णपणे लोखंडाचा असल्यानं त्याला पत्री पूल असं नाव पडलं. कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांना जोडण्यासाठी पत्री पूल हा एकमेव दुवा होता. यावर्षी जुलै महिन्यात अंधेरीच्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर पत्री पुलाचं आयआयटी मुंबईकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं, ज्यात पत्री पूल धोकादायक असल्याची बाब समोर आली होती.

त्यानंतर 22 ऑगस्टपासून पत्री पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करत 25 सप्टेंबर रोजी पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली. तर आज पुलाचा गर्डर उचलण्यात आला. तब्बल 60 टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी 600 आणि 400 टन क्षमतेच्या दोन अजस्त्र क्रेन मागवण्यात आल्या होत्या.

पुलाच्या गर्डरचे मधून दोन तुकडे करून ते क्रेनच्या साहाय्याने उचलण्यात आले. या कामासाठी रेल्वेनं कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेतला होता. यादरम्यान डोंबिवली ते सीएसएमटी आणि कल्याण ते कर्जत, कसारा यादरम्यान रेल्वेनं तब्बल 178 लोकल फेऱ्या चालवल्या. तर कल्याण डोंबिवलीदरम्यानच्या प्रवासासाठी केडीएमटी आणि एमएसआरटीसी यांनी तब्बल 327 बस फेऱ्या चालवल्या.

दरम्यान, पत्री पुलाच्या जागी नवीन पूल उभारणीसाठी एमएसआरडीसी विभागाकडून टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढच्या आठ ते दहा महिन्यात इथे नवीन पूल उभारण्यात येईल, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

दुसरीकडे पत्री पुलाप्रमाणेच मुंबईतले आणखी काही पूल धोकादायक असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील एकूण 299 पुलांपैकी 198 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झालं असून त्यात भायखळा आणि घाटकोपरचे पूल हे जीर्ण झाल्याचा गौप्यस्फोट रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे लवकरच हे दोन पूलसुद्धा पाडण्यात येणार आहेत. तर आणखी काही पूल सुद्धा धोकादायक म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे.

पत्री पुलाच्या पाडकामामुळे कल्याण शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून याजागी आता लवकरात लवकर नवीन पूल उभारण्याची गरज आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget