एक्स्प्लोर

जेपी नड्डा यांना 'बिहारी' सांगण्यामागे मोदींची रणनीती

भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेपी नड्डा यांना पंतप्रधान मोदी यांनी बिहारी सांगण्यामागे मोठा अर्थ दडला आहे. कारण, यावर्षीच्या अखेरीस बिहारची निवडणूक आहे. ही निवडणूक जिंकणं भाजपसाठी महत्वाचे आहे.

मुंबई : भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर बिहार निवडणुकीचं आव्हान असणार आहे. याची रणनीती आखण्याची तयारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलीय. अध्यपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर मोदी यांनी एका वक्तव्याद्वारे याचे संकेत दिलेत. जेपी नड्डा अध्यक्ष झाल्याने हिमाचल प्रदेशचे नागरिक आनंदी असतील, मात्र त्यांच्यापेक्षाही जास्त आनंद बिहारच्या नागरिकांना होणार आहे. कारण, नड्डा यांचं शिक्षण पटनात झालं असल्याचं मोदी म्हणाले. जगत प्रकाश नड्डा यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली माहिती सत्य आहे. मात्र, ही माहिती सांगण्यासाठी मोदींनी साधलेली वेळ आणि ठिकाण याला फार महत्व आहे. या वर्षीच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्लीतील विधानसभा निवडणुकांत दाळ शिजणार नाही, याची कल्पना भाजपला आल्यानेच भाजपने आता बिहारकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळेच मोदींनी नड्डा यांच्या बिहार कनेक्शनचा उल्लेख केला. भाजपचे नवे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 ला पटनामध्ये झाला आहे. येथील सेंट जेवियर स्कूलमध्ये त्यांचं दहावीपर्यंतचे शिक्षण झालं. तर, पटना विद्यापीठातून त्यांनी बीएमध्ये पदवी घेतली. नंतर नड्डा कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी शिमल्याला आले. तिथेच एबीवीपीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मोदींच्या वक्तव्यामागे मोठा अर्थ - भाजपचे माजी अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह यांनी याआधीच बिहारची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची घोषणा केली आहे. मागच्याच आठवड्यात वैशाली येथे झालेल्या एका कार्यक्रमात याचा पुनरउच्चार करण्यात आला. भाजप आणि जेडीयूमधील काही नेत्यांना निवडणूक सोबत लढू नये असं वाटतंय. मात्र, निवडणूक सोबत लढवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तयारी केली आहे. नड्डा यांना बिहारी सांगण्यामागे मोदींची मोठी योजना आहे. बिहारची निवडणूक जिंकणे भाजपसाठी खूप महत्वाचे आहे. कारण, एकापाठोपाठ एक राज्य भाजपच्या हातातून निसटून जात आहेत. अशातच जेडीयूसोबत युती टिकवणं हेही भाजपसमोरील एक आव्हान आहे. दोन्ही पक्षातील नाराजी जगजाहीर आहे. याचमुळेच मोदींच्या मंत्रीमंडळातून जेडीयू बाहेर आहे. बिहारसाठी भाजपची रणनीती - जागांच्या वाटपावरुन आत्ताच भाजप आणि जेडीयूमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. दोन्ही पक्षातील नेते आपापले फॉर्मुले सांगत आहे. भाजप 50-50 च्या फॉर्मुल्यावर निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहे. तर, जेडीयू कुठल्याही परिस्थितीत भाजपपेक्षा जास्त जागांवर दावा सांगत आहे. नितीश कुमार यांचे सल्लागार 2010 चा फॉर्मुला योग्य असल्याचे सांगत आहे. त्यावेळी जेडीयू 140 जागांवर लढली होती. मात्र, त्यांच्या वाट्याला 103 च जागा आल्या होत्या. त्यावेळी लोक जन शक्ति पक्ष युतीतून बाहेर होता. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत 50-50 च्या फॉर्मुल्यावर दोन्ही पक्ष अडून बसले होते. जेडीयूकडून प्रशांत किशोर मोर्चेबांधणी करत आहेत. पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी ते वातावरण निर्मिती करत आहेत. त्यामुळेच मोदींनी नड्डा यांना पुढे केले आहे. ते पण त्यांना बिहारी सांगत. हिंदी भाषिक भागात प्रभाव असलेल्या भाजपकडून राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि झारखंड ही राज्य गेली आहेत. त्यामुळेच बिहार ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने आता नवीन रणनीती आखायला चालू केली आहे. BJP President | भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची आज निवडणूक, जे.पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget