एक्स्प्लोर

 … तर मोदी नव्हे प्रणव मुखर्जी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?

काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे प्रणव मुखर्जी हे भाजपशासित एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील, असा अंदाज शिवसेनेने व्यक्त केला आहे.

मुंबई: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर, अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. हे तर्कवितर्क अजूनही सुरुच आहेत. आता तर थेट प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे प्रणव मुखर्जी हे भाजपप्रणित एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील, असा अंदाज शिवसेनेने व्यक्त केला आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, “2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमत मिळवण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आरएसएस त्या स्थितीसाठी तयारी करत आहे. जर बहुमत मिळण्याची शक्यता कमी वाटली तर संघाकडून प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकतात. भाजप यावेळी कमीत कमी 110 जागा गमावणार हे नक्की” शर्मिष्ठा मुखर्जी यांची प्रतिक्रिया संजय राऊत यांच्या या अंदाजानंतर प्रणव मुखर्जींची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं. शर्मिष्ठा म्हणाल्या, “मिस्टर राऊत, भारताचे राष्ट्रपतीपदावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर, माझे वडील पुन्हा सक्रिय राजकारणात येणार नाहीत” प्रणव मुखर्जी संघ मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 7 जून रोजी नागपुरातील संघ मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत नागपुरात झाला. यावेळी प्रणव मुखर्जींनी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडली. संघाच्या मंचावरुन प्रणव मुखर्जींनी देशभक्तीचे धडे दिले. प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द प्रणव मुखर्जी यांनी यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत. अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. काही काळासाठी ते काँग्रेसवर नाराजही होते, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केली, मात्र पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. 2004 साली काँग्रेसने विजय मिळवला तेव्हा प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान असतील, अशी चर्चा होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. काँग्रेसच्या पाठिंब्यावर 2012 साली ते राष्ट्रपती झाले. संबंधित बातम्या  वसुधैव कुटुंबकम् हीच भारताची खरी ओळख : प्रणव मुखर्जी   प्रणव मुखर्जी स्वतःच्याच मुलीच्या निशाण्यावर 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: 36 हजार 585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 3 धडाकेबाज निर्णय
36 हजार 585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 3 धडाकेबाज निर्णय
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Vidhan Parishad Election 2026: महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी हालचालींना वेग, रवींद्र चव्हाण अन् सुनील तटकरेंमध्ये राजकीय खलबतं; बंडखोर उमेदवारांना निर्वाणीचा इशारा
महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी हालचालींना वेग, रवींद्र चव्हाण अन् सुनील तटकरेंमध्ये राजकीय खलबतं; बंडखोर उमेदवारांना निर्वाणीचा इशारा
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
ह्रदयद्रावक... मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले
Jalna Crime News: स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी निष्पापाचा बळी! जालन्यात कर्जबाजारी इसमाचा भयानक कट पोलिसांनी केला उघड
Gold : आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
आता घरांमधील 32,000 टन सोन्यावर सरकारची नजर! काय आहे मोदींचं आवाहन अन् त्यामुळे कोट्यवधी डॉलर्स कसे वाचणार?
Dattatray Gade Swargate case: गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
गुगल सर्च हिस्टरी, सीसीटीव्ही, ध्वनी तीव्रता पडताळणी मुख्य पुरावा! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेविरुद्ध दोषारोप निश्चित
Raosaheb Danve and Rajesh Tope: राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
राजेश टोपे भाजपमध्ये येणार का? रावसाहेब दानवेंचा मोठा पॉज, मग हसत-हसत म्हणाले...
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी योजनेस कॅबिनेट बैठकीत मंजुरी; राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ
Embed widget